रविवार, २४ जानेवारी, २०१६

बुद्धीभेद्यांचे राज्य

हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमूला प्रकरण दिवसेंदिवस चिघळले जात असून,यानिमित्ताने अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत,देशातील आरक्षणधारक मागाससमाज आणि विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची आणि प्रतारणेची भावना घट्ट होत चालली आहे.रोहित वेमूला प्रकरणास सरकारमधील नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थ्यी संघटना ज्या पद्धतीने व्यक्त होत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरून त्यांची नियत संशयास्पद आणि दलित मागास समूहविरोधी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.मनुष्यबळ आणि विकासमंत्रालय मंत्री स्मृती इराणी यांनी रोहित वेमूला आत्महत्येप्रकरणी धादांत खोटी आणि बुद्धिभेद करणारी विधाने केलेली आहेत.त्या म्हणतात त्यांच्या खात्याने कोणत्याही प्रकारचा दबाव हैद्राबाद युनिव्हर्सिटीवर आणलेला नव्हता,
हे त्यांचे म्हणने मान्य करायचे तर मग त्यांनी विद्यापीठाला कडक कारवायी करा अशा आशयाची पाचपाच पत्रे कोणत्या उद्देशाने पाठविली होती? हा प्रश्न इथे उपस्थित होतो.
स्मृती इराणी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या विद्यापीठाच्या चौकशी समितीमध्ये चौकशीप्रमुख अध्यक्ष “दलित” प्राध्यापक होते.वस्तुस्थिती अशी आहे कि समितीअध्यक्ष किंवा सदस्यसुद्धा दलित नव्हते तर ब्राह्मण होते. हे या मंत्रीबाई का दडवत आहेत?
या त्यांच्या धादांत असत्यकथनामुळे चिडून विद्यापीठातील २० पैकी १० दलित प्राध्यपकांनी आपल्या प्रशासकीय पदावरून राजीनामा दिलेला आहे.
स्मृती इराणी म्हणतात विद्यापीठात काही राष्ट्रविरोधी कारवायी करणारी मुले होती त्यांच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला,रोहित आणि त्याची संघटना हिंसक कारवाया करते,त्यातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थ्यी सेनेच्या अध्यक्षाला मारहाण केली,वस्तुस्थिती अशी आहे कि विद्यापीठाने गठीत केलेल्या चौकशीत कोणतीही मारहाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत,आणि हि गोष्ट लिखित स्वरूपात समितीच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.याचा अर्थ जो मारहाणीचा कांगावा केला जातो आहे ती प्रत्यक्षात झालेलीच नाहि.वस्तुतः सुशीलकुमारला अपेंडिक्सचा त्रास होता त्याकारणाने त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते.स्मृती इराणी म्हणतात रोहित वेमूला ‘दलित’ नाही,केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याप्रमाणे तो ओबीसी प्रवर्गातील होता.त्यामुळे हा दलित-दलितेतर वाद  नाही,यावरून राजकारण करू नये.वस्तुस्थिती अशी आहे कि,रोहितचे कायदेशीर जातप्रमाणपत्र माध्यमांत सादर झाले आहे.त्यानुसार रोहित हा एससी म्हणजे शेड्युल्डकास्ट अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे.याचा अर्थ तो ‘दलित’ आहे हे स्पष्ट होते,दुसरा मुद्दा जर तो ओबीसी प्रवर्गातील असता तरी तो ढोबळमानाने दलितच गणला गेला असता.दलित हि स्थितीवाचक आणि समूहवाचक संज्ञा आहे.हे स्मृती इराणीबाईना माहित नसावे.आणि तिसरा मुद्दा असा आहे कि तो कोणत्याही जाती-जमाती प्रवर्गातील असला तरी एक माणूस म्हणून त्याला न्यायमिळवून देणे हे आपले प्रथम कर्त्यव्य नाही काय? कि थातुरमातुर स्पष्टीकरण देत या प्रकरणावरच वेगळे राजकारण करायचे ? एका विद्यापिठीय घटनेत उच्चस्तरावरील दोन दोन केंद्रीय मंत्र्यांनी इतका रस का घेतला होता हे घटनेचे राजकारण करू नका असे म्हणनाऱ्यांनी सांगितले पाहिजे.हे उच्चस्तरीय राजकारण कसे काय चालू शकते याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे.मुख्य म्हणजे मंत्रीबाईना रोहितची जात शोधण्याची आणि तिचा संबंध आपल्या नेत्याच्या जातीशी जोडण्याची घाई हे प्रकरणाला मुद्दाम वेगळे वळण देत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व पाहता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती काय अहवाल देईल याचा पुरेसे अंदाज बांधण्यात काही हरकत नाही.
रोहितच्या बातम्याप्रसार माध्यमात आल्यानंतर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदीची मागणी सोशल माध्यमांत जोर धरू लागल्यानंतर abvp विद्यार्थी सेना सक्रीय झाली. रोहितच्या विरोधात त्यांनी पुन्हा विखारी विषारी प्रचारप्रसार करायला सुरुवात केली.रोहितच्या फेसबुकवॉलवरील पोस्ट वापरून त्याचा चुकीचा अर्थ लावत फोटोशॉप केले गेले.आणि लोकांचा अतिशय पद्धतशीरपणे बुद्धिभेद सुरु केला हे इतके मोठ्याप्रमाणावर आणि संघटीतरित्या सुरु झाले कि हे लोक याच संधीची वाट पहात होते कि काय असा संशय निर्माण होतो आहे.  
कधी रोहित हा नक्षलवादाशी संबंधित आहे तर कधी डाव्या कम्युनिस्ट चळवळी संबंधित आहे अशा प्रकारची वक्तव्य आणि लेख/पोस्ट लिहिले जाऊ लागले आहेत. याकुबच्या फाशीला विरोध केला असाही धादांत खोटा प्रचार केला जात आहे.देशद्रोही मेला असे म्हणून विकृत आनंदही व्यक्त केला जातोय.एकीकडे त्याला देशद्रोही म्हणायचे नक्षलावादी म्हणायचे दुसरीकडे त्याला श्रद्धांजली  देखील वहायचे नाटक करायचे असे प्रकार abvp ने सुरु केले आहेत.आपली भूमिका कधीच समजू न द्यायची काळजी हिंदुत्ववादी पक्ष संघटना या नेहमीच घेत आलेल्या आहेत.सतत बुद्धिभेद करत राहण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.आपल्याच पक्षातील नेते आणि संबंधित संघटना या मृत्यूनंतरही रोहितला बदनाम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहितला मृत्यूनंतर गौरान्वित करत “भारतमातेने सुपुत्र गमावला मला,अतिशय दुःख झाले”असल्याची भावना व्यक्त करतात तेव्हा सामान्य माणूस बुचकळ्यात पडल्याशिवाय रहात नाही.नरेंद्र मोदीना खरे मानायचे तर स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे खोटे आणि उघडे पडतात आणि जर या दोघांचे म्हणने मान्य करायचे तर पंतप्रधान खोटे ठरतात असा पेच निर्माण झालेला आहे.त्यामुळे सामान्यनागरिकांच्या मनात संभ्रम आहे.
नरेंद्र मोदीच्या याच कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी “मोदी गो-ब्याक” "रोहित वेमूला अमर रहे" अशा घोषणा दिल्या होत्या,आता त्या विद्यार्थ्यांवरही निलंबनाची तलवार लटकली आहे.
रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणार्यांना भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यमस्वामी यांनी वादग्रस्त वक्त्यव्य करत कुत्र्याची उपमा दिली आहे.अशीच उपमा मागे याच पक्षाचे एक नेते व्हि के सिंह यांनी दलित-ओबीसी मुलांच्या जळीत प्रकरणी दिलेली होती.याअगोदर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसंबंधी एका वक्त्यव्यात त्यांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी  केली होती.यावरून भारतीय जनता पार्टी दलित-मुस्लिम समाजाला कोणत्या नजरेतून पाहते हे लक्षात येते.अलीकडेच असहिष्णुतेच्या मुद्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोर्चा आयोजित केला होता.तेच अनुपम खेर आता एका व्हिडीओद्वारे काश्मिरी पंडितांच्या मुद्यावर आव्हान देताना दिसत आहेत,हा व्हिडीओ कोणत्याही हिंदुच्या भावना भडकतील अशा पद्धतीने बनविण्यात आला आहे,सरकार भाजपाचे असताना हा मुद्दा व्हिडीओद्वारे लोकांसमोर न्यायची गरज का वाटते? हा मुलभूत प्रश्न आहे.रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी याच सरकारचे नेते,आता व्हिडीओ आणि शिलापूजन जोरात सुरु आहे त्यामुळे छातीत धडकी भरते.काळजी वाटते.सरकार गरीब जनतेच्या संरक्षणासाठी आहे कि जातीय आणि धार्मिक धृवीकरण करत तेढ निर्माण करणारे राजकारण करत आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडणारे आहे.
भाजपासरकारला या देशात नक्की काय हवे आहे हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.

बुधवार, २० जानेवारी, २०१६

रोहित वेमुलाने आत्महत्या केली नाही

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विज्ञानसंशोधन विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या २८ वर्षीय रोहित वेमूला या स्कॉलर विद्यार्थ्यावर २१व्या शतकातही सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने मानसिकदृष्ट्या खचून जाऊन वसतीगृहातील खोलीतच रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारमधील काही मंत्री,हिंदुत्ववादी विद्यार्थ्यी संघटना यांच्यामार्फत जातीयद्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारतवसतीगृहकॅन्टिनग्रंथालयासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत सोमवारी सकाळपासून यास जबाबदार असलेल्या विद्यीपीठ प्रशासन आणि भाजपचे केंद्रीय श्रममंत्री व आरएसएस सदस्य बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली असून तेलंगणा बंदची हाक देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे पाहूया.
रोहित वेमूला हा (ASA) आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.
३० जुलैला याकुब मेननला फाशी देण्यात आली तेव्हा देशात फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा वाद बराच रंगला होता,त्यानिमित्ताने एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चासत्रात ASA आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थ्यीविंग आहे.यांच्यात फाशीच्या मुद्यावरून मतभेद झाले होते.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे असे म्हणने होते कि याकुबला सश्रम कारावास जन्मठेप दिली जावी.त्याच्याकडून आणखी काही माहिती धागे-दोरे मिळतात का हे पाहिले जावे.तर दुसरीकडे ABVP चे म्हणने होते याकुबला फाशीच व्हायला हवी.गुन्हेगारांना फाशी द्यावी कि न द्यावी याविषयी देशात अनेक वेगवेगळी मते आहेत.याकूबची फाईल दहाव्या नबंरवर असताना सरकारने याकुबला फासावर लटकाविण्याची घाई केली.ABVP संघटना हि भाजपासरकारचाच एक भाग असल्यामुळे त्यांनी याकूबच्या फाशीवर जोर देणे स्वाभाविक आहे.देशातील सत्तांतरामुळे देशात असहिष्णुतेचे वातावारण असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील काही विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनवर फाशीला विरोध करतात म्हणून देशद्रोही असल्याची टिप्पणी केली.यामुळे दोघांमध्ये खटका उडाला होता.
याविषयीचा वाद विद्यार्थ्यांच्या फेसबुकवरपेजवरही काही दिवस पहायला मिळत होता.पुढे ऑगस्ट 03/08/2015 आणि 04/08/2015 ला दिल्ली विद्यापीठात “मुझ्झफरनगर अभी बाकी है ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने आयोजित केले होते,ते होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध करत हिंसक निदर्शने केली होती.हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता.त्यामुळे पुन्हा दोघांत संघर्षाची ठिणगी उडाली.
माहितीपटाचे प्रदर्शन झाल्यामुळे चिडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष सुशीलकुमार याने आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना फेसबुकपेजवर अपशब्द वापरले.त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली.सदर प्रकाराबाबत विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकार्यांच्यासमोर सुशीलकुमारने माफी मागितली खरी परंतु तो राग मनात ठेवून सुशीलकुमारने त्याच रात्री स्वत:ला हैद्राबादमधील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.पोलिसांत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली.यात ज्या पाच विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली ते या प्रकरणात कुठेच हजर देखील नव्हते.विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकारी प्रा.आलोक पांडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सुशीलकुमारवर कुणीही शारीरिक मारहाण किंवा हल्ला केला नसल्याचा अहवाल दिला.परंतु तरीही अनाकलनीयपद्धतीने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश दिले गेले.या आदेशाच्या विरोधात सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी विद्यार्थ्यी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.तेव्हा माजी कुलगुरू प्रा.पि शर्मा यांनी सदर विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले पुन्हा नव्याने चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली.
याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थ्यी केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे गेले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि भाजापाचीच विद्यार्थ्यी विंग असल्यामुळे बंडारु दत्तात्रय यांनी यात जातीने लक्ष घालून ताबडतोब केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना १७/०८/२०१५ ला पत्र लिहून विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पाठवलेत्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सदर विद्यापीठाला तत्काळ स्पष्टीकरण मागत चौकशी करून कारवायी करण्याचे आदेश पत्रात दिले.यावर पुन्हा अगोदरच्या समिती बरखास्त करत नविन दोन सदस्यीय समिती नेमली गेली.दोन पोलीस दोन सुरक्षा रक्षक आणि दोन तक्रारदार यांच्या जबानीवर विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेत विद्यापीठ प्रशासन सदर विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले.विद्यापीठाची प्रशासकीय इमारतवसतीगृहकॅन्टिनग्रंथालय यासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आले. विद्यापीठ प्रशासन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भाजपाचे मंत्री यांच्या संगनमताने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.विद्यापीठीय राजकारणाने निरपराध विद्यार्थ्याना उध्वस्त करत त्यांच्या करिअरचा बळी घेतलाच त्यात एकाचे आयुष्यही हिरावून घेतले गेले. याविरोधात आता  तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थींनी संघटनांनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
सर्वच स्तरातून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गलीच्छ राजकारण दंडेली आणि दहशत निर्माण करणाऱ्या ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे.सदर संघटना हि घटना विरोधी कृत्यात अनेकदा सहभागी असल्याचे दिसून येते. काही ठळक घटना पाहिल्या तर चेन्नई मधील IIT संस्थेत एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या गोमांस भक्षण आणि हिंदीप्रभुत्ववादाच्या धोरणाबद्दल चर्चा झाली आणि त्यातून या मुद्द्यांना विरोध झाला आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विध्यार्थी संघटनेविरुद्ध ABVP संघटनेने बंदीची मागणी घातली सदर कार्यक्रमाचे रिपोर्टिंग थेट मनुष्यबळ मंत्रालयाला केले गेले आणि तिथून ताबडतोब बंदीचे आदेश निघाले या बंदीला झालेल्या जोरदार विरोधामुळे सरकारने शेवटी माघार घेतली.त्यानंतर एफटीआयआयमध्ये सरकारपुरस्कृत गजेंद्र चौहान आणि अजून पाच सदस्यांच्या नियुक्तीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उपोषण केले,त्यांना धमकावण्याचे काम या संघटनेने केले आहे. मागे मुंबईतील सेंटझेवियर्समध्ये शाहीर शितल साठेचा कार्यक्रम होता तो धमक्या मनगटशाहीच्या जोरावर ABVP संघटनेने होऊ दिला नाही. त्यानंतर तीन तारखेला सोलापूर येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून कार्यक्रम उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनीच चोप देवून त्यांना पळवून लावले. यावरून सदर संघटना शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे हे स्पष्ट होते.घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संघटनेला मान्य नाही.तसेच तीला सत्ताधारी सरकारचे पाठबळ असणे हे अत्यंत घातक आहे.या सर्वांचा नीट विचार केला तर असे दिसून येते कि भाजपासरकार पद्धतशीरपणे इथे विशिष्ट विचारसरणी रूजवू पहात आहे.
आणि मागासवर्गांना शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग करत आहे.
एकीकडे सबका साथ विकासच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षणक्षेत्रात राबवायच्या,आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा,मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लावायची आणि दुसरीकडे शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची त्रास द्यायचा हिंदुत्ववादी अजेंडे राबवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे उद्योग करायचे.रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या प्रोक्टोरियल चौकशीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना गुंड म्हणायचे त्यांनी याकूबला समर्थन दिले म्हणून देशद्रोही म्हणायचे असे खोटेच प्रचार आता हि संघटना करत असून त्यांच्या राजकारणाने झालेल्या खुनाचे एक प्रकारे समर्थन करण्याचा उद्योग चालू झाला आहे.भाजपा आरएसएसचे धार्मिक आणि जातीय धृवीकरण देशाला नविन नाही.हे सर्व पाहता हि ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे असे म्हणता येते. हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद आहे. आणि जे घटक विचारसरणी यास विरोध करेल ते राष्ट्रद्रोही आहेत.हि भाजपा संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांची संकल्पना आहे.याच खुळचट भावनेतून आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कारवायी केली गेलीय.त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील नेत्यांच्या संगनमताने घडवून आणलेला हा खून आहे असे विविध पुरोगामी डाव्या आणि मागासवर्गीय संघटनाचे म्हणने आहे. भाजपासरकार संबंधित नेत्यांचे राजीनामे घेऊन त्यांना शासन करणार कि नाहीत्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नयेअशा संघटनावर बंदी घालून शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?

चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले,चन्द्रशेखर आझाद यांची हि आत्महत्या नाही. रोहित वेमूलाने हेच केले.अशी भावना आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात जोर धरू लागली आहे.भडकलेली हि तरुणांची आग सरकारला अडचणीचे ठरेल यात शंका नाही.
सोशल मीडियातही तरुण वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. ‪#universityofhyderabad ‪#Rohit_Vemula ‪#BanABVP हे हॅशटॅग ट्रेंड दिवसभर दिसत होतेत्यामुळे तरुणांची भावना लक्षात येते. दिल्ली युनिव्हर्सिटी मुंबई कलिना युनिव्हर्सिटीसह देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासाठी तरुण एकवटले आहेत.
एका निरपराध विद्यार्थ्याला अशा प्रकारे आपले जीवन संपावायला लागणे हे तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे.


गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्याचा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न

3 जानेवारी रोजी पुण्यातील मारुंजी,जांभे व नेरे अशा तीन गावच्या सीमेलगतचा साडेतीनशे एकरचा परिसरात एका संघटनेच्या शक्तीप्रदर्शनाद्वारे पुरोगामी महाराष्ट्राच्या भवितव्याला आव्हान देणारा मेळावा भरवला गेला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) म्हणजे संघ हि कट्टरपंथीय हिंदुत्ववादी धार्मिक संघटना म्हणून प्रसिद्ध आहे.संघाने असे शक्तीप्रदर्शन करणे हे काही नविन नाही,या अगोदरही संघ देशात असे प्रदर्शन करत आलेला आहे.यावेळी बात थोडी निराळी आहे.यावेळी त्यांनी निवडून आणलेलं त्यांच्याच विचारांचे सरकार सत्तेत आहे.या अगोदरही संघाने असे शक्तिप्रदर्शन केलेले आहे. परंतु तेव्हा केवळ हिंदू शक्ती संगम” अशा नावाने ते होत असे.यावेळी मात्र शिवशक्ती संगम” असे नाव देत शक्तिप्रदर्शन झाले.यास अनेक वेगळे संदर्भ आहेत.पुणे मावळ भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वाने घडलेला प्रदेश इथल्या मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला.सह्याद्रीपर्वताच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.स्वातंत्र्योत्तर अलिकडील काळात ढोबळमानाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्या विचारांच्या लोकांचा असणारा बहुजनबहुल भाग म्हणून या प्रदेशाची ओळख आहे.छत्रपतींचा आशीर्वाद चला देवू मोदींना साथ” असा निवडणुक प्रचार करत भाजपा सत्तेत आली.यात संघांचा वाटा मोठा अन महत्वाचा होता.सदर कार्यक्रमात आजवर कधीही न पाहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांची साईबाबास्टाईल आशीर्वाद देणारी प्रतिमा म्हणजे जाणीवपूर्वक त्यांचे केले जाणारे हिंदुत्ववादी दैवतीकरण आहे.गोब्राह्मणप्रतिपालक कि बहुजन प्रतिपालक” असा महाराष्ट्रात उभा वाद आहे.ब्राह्मण व्यक्तीने सुरु केलेल्या या संघटनेत सुरुवातीला महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही मोजक्या व्यक्तीच सहभागी होत्या. आणि हे बराच काळ असेच राहिले त्यामुळे संघाची भटाबामणांची संघटना म्हणून ओळख निर्माण झाली. पुढच्या काळात यात ब्राह्मणेतर वर्गातील लोकाना प्रवेश दिला जावू लागला. हि ओळखपुसण्यासाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे वाढलेले प्रस्थ आणि संघावर सतत होणारी ब्राह्मण्यवादी असण्याची टिका या गोष्टी दडपण्यासाठी संघाला हे नाव घेऊन शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करत बहुजन तरुण आकर्षित करणे भाग होते यात भविष्यातील राजकीय गणिताचा सुद्धा एक भाग आहे.संघाचा स्वयंसेवक हा अल्टीमेटली भाजपाचा सभासद,कार्यकर्ता,पदाधिकारी किंवा उमेदवार असतो.हे सर्व लक्षात घेता भविष्यात सामाजिक आणि राजकीय प्रतलावर फार मोठी उलथापालथ होणार आहे हे नक्की.वास्तविक आरएसएस (संघ) हे कट्टरपंथीय हिंदुत्ववादी संघटन आहे.त्यांना पुरातन हिंदू संस्कृती वेदशास्त्रे आणि त्याअनुषंगाने आलेली परंपरा थोडक्यात पूर्वीची वर्णव्यवस्था इथे हवी आहे.यासाठी संघाने अनेक विंग्स काढल्या आहेत.त्यापैकी प्रमुख म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासी कल्याण आश्रम राष्ट्र सेविका समिती या माध्यमातून संघ समाजातील विविध स्तरातील तरुणांना आकर्षित करून संघात सामील करून घेत आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मताप्रमाणे संघात विविध सामाजिक स्तरातून येणाऱ्या स्वयंसेवकांना हिंदू म्हणून पाहिले जाते,त्याचबरोबर त्यांची मूळ ओळख कायम जपली जाते.याचा अर्थ स्वयंसेवक हिंदू असला तरी त्याची पोटजात त्याच्याबरोबर कायम असणार आहे.आणि त्याअर्थाने समाजात जी विषमता आहे ती पुन्हा संघात कायम असणार आहे,समाजात जसे हिंदू धर्म म्हणून एक आणि पुन्हा जात म्हणून निराळी ओळख अशीच इथेही परिस्थिती आहे,
पूर्वी केवळ हिंदू समाजापुरते मर्यादित असणारा संघ आता आणखी व्यापक झाला आहे,विविध सामाजिक पुरोगामी चळवळ संघटना यांच्यातील समन्वयाचा अभाव,एकमेकांविषयी असणारे संशय,वैचारिक मतभिन्नता,मरगळ निरुत्साह यामुळे जी सामाजिक वैचारिक पोकळी निर्माण झाली,आणि सांघिक स्तरावरील एकात्म भावनेचा अभाव निर्माण झाला नेमका तोच मुद्दा पकडून संघशक्तीने हि पोकळी भरून काढायचा प्रयत्न सुरु केला आहे.याचबरोबर हिंदू म्हणून एक नविन व्यापक थिअरी मांडायला सुरुवात केली.मोहन भागवत अलीकडे हि अचाट थिअरी मांडतात कि मुस्लिम ख्रिश्चन हे सुद्धा हिंदूच आहेत,मुस्लिम समाज स्वभावाने हिंदू आहेत्यांना भजन आवडते म्हणून त्यांनी कव्वाली सुरु केलीमूर्तीपूजा आवडते म्हणून मजार-कबर पूजन सुरु केले त्या अर्थाने ते हिंदूच आहेत.खरेतर वरवर हे सार्धम्य दिसत असले तरी तसे ते मुळातच नाही.हा केवळ एक अतिशय चपखल असा बुद्धिभेद आहे.याच हेतूने २००४ साली संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंचची स्थापना करून आणखी एक विंग निर्माण केली.आणि आता ख्रिश्चन विंग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हि सगळी एक गंमतच आहे,संघाचा मुस्लिम धर्माला विरोध आहेख्रिश्चन धर्माला विरोध आहेआणि म्हणून धर्मांतरास विरोध.यासाठी धर्मांतर विरोधी कायदा करण्यास संघ आग्रही आहे.बाबरी पतन याच विरोधातून घडलेदेशभरात दंगली घडल्या त्या याच विरोधातून.हिंदुत्ववाद्याकडून दिल्ली-गोवा येथील चर्चवर हल्ले केले गेलेमिशिनरी लोकांच्या हत्या झाल्या त्या याच विरोधातून.मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी शिफारशी केलेल्या सच्चर कमिटीला संघाने पत्र लिहून कडवा विरोध केलेला आहे.संघाच्या धर्म जागरण मंचाने ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या मुळच्या हिंदू धर्मियांचे पुन्हा फेर धर्मांतर आग्रा येथे आयोजित केले होते.परंतु राजकीयदृष्ट्या ते नुकसानीचे ठरल्यामुळे मोदी सरकारच्या सांगण्यावरून सदर कार्यक्रम रद्द केला गेलामुस्लिम धर्मियांची हिंदू धर्मात घरवापसी मध्यंतरी गाजली होतीच.यावरून संघाचा खरा अजेंडा आणि छुपा अजेंडा लक्षात यायला वेळ लागत नाही.
संघ जे दाखवतो आहे दर्शन घडवतो आहे ते वरवरचे असून जमिनी हकीकत हि आहे.संघाचा विचार सर्व स्तरात पसरविणे आणि आपले विरोधक आपल्याच अजेंड्याखाली सामावून घेणे हे धोरण संघाने अलीकडे राबविण्यास सुरुवात केली आहे.या अगोदर मात्र संघात हिंदू नसणाऱ्या समाजाला प्रवेश नव्हता.मुस्लिम जर हिंदूच आहेत आणि ईश्वर हा सर्वव्यापी आहे.चराचरात सामावलेला आहे तर बाबरीमध्ये राम मंदिरच असावे असा अट्टाहास संघ कशाला करत आहे? याचा अर्थ परस्परविरोधी विधाने करून गोंधळ उडवून देणे आणि आपले अजेंडे रेटने हेच संघ आजवर करत आलेला आहे.भाजपात असणारे मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांचे भाजपामध्ये काय स्थान आहे हे सर्वांना माहित आहेदादरी किंवा इतर अशा घटना घडल्या कि हे नेते अज्ञातवासात जाणेच पसंत करतात. त्यामुळे अशाच प्रकारे एकदा का संघात मुस्लिम आणि ख्रिश्चन विंग उभ्या राहिल्या कि त्या आपल्या धर्मातील विरोधकांना अडचण निर्माण करणाऱ्या ठरणार हे ओघाने आलेच.संघाच्या भगव्या छत्रीखाली सगळेच धर्म एकवटले कि हिंदू हा एक व्यापक वर्ग निर्माण होईल आणि तोच एकमेव धर्म बाकी त्याच्या विविध शाखा पंथ म्हणून गणल्या जातील,यामुळे विविधता संपुष्टात येईलच,त्यापेक्षा जास्त घातक इथे पुन्हा काही विशिष्ट मुठभर लोकांचे निरंकुश राज्य निर्माण होईल.कोणत्याही गोष्टीला एकदा समाजाने स्वीकारले सामाजिक मान्यता दिली कि ती प्रथा होवून जाते.इथल्या वर्णव्यवस्था त्यानंतरची जातीप्रथा आजही टिकून आहे ती यामुळेच.
मोहन भागवत एका भाषणात म्हणाले होते कि संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही. संघ राजकारण करत नाहीसंघ जाणूनबुझून पक्षीय राजकारण निवडणुका यापासून लांब राहतो हे भाषण निवडणुका जाहीर होण्याआगोदरचे आहे.त्यानंतर संघाने भाजपसाठी कसा देश पिंजून काढला आणि स्वयंसेवक कसे अहोरात्र मेहनत घेत होते याचे कवीत्व निवडून आल्यानंतर सुरु झाले होते.निवडणुकांच्या अगोदर संघाशी थेट संबंध टाळणारे नेते किंबहुना संघाच्या कार्यक्रमास उपस्थित न राहणारे निवडून आल्यानंतर मात्र संघाच्या बैठकींना पूर्ण गणवेशात हजेरी लावू लागले.राजकारण करत नाही असे म्हणणाऱ्या संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशाळा’ घेऊन सरकारच्या कामगिरीचा अहवाल मागवला होता.यावरून संघ जे दाखवतो त्यापेक्षा संघाची ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे फार निराळी असतातधक्कादायक असतात हे स्पष्ट होते. सामाजिक समरसता हा संघाचा आवडीचा अजेंडा.हिंदू धर्मातील विषमता हि जातीमुळे आलेली आहे.त्यामुळे हिंदू धर्म आजही परस्पर भेदभाव पाळत असतो.जातियवाद जोपासत असतो.ते मिटविण्यासाठी संघ आग्रही आहे असे दाखवत असला तरी त्यांना जात निर्मुलन करायचे नसून केवळ जाती तशाच ठेवून सर्व जातींना समान पातळीवर पहा असे सुचवायचे असते.आणि समानता हि सुद्धा वरवरची असून समरसतेच्या नावाखाली व्यक्तींचे वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारत ते धार्मिकअधिपत्याखाली आणावयाचे आहे.स्वतंत्र आचार-विचार न करता धर्मात जे नियम आहेत जी शिकवण आहे ती पाळली गेली पाहिजे असे संघाचे म्हणने आहे.त्यामुळे हि सामाजिक समरसता तकलादू आणि ब्राह्मण्यवादच जोपासणार हे उघड आहे.आणि म्हणून त्याचा समाजाला काहीएक उपयोग नाही.खरेतर आता जातींना विसर्जित करत त्यांचे समूळ निर्मुलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे काम मोहन भागवत व त्यांचा संघ चांगल्याप्रकारे करू शकतो.जर त्यांना याविषयी प्रामाणिक कळकळ असेल तर. कारण ज्यांनी निर्माण केले आहे त्यांनीच हे नष्ट केले पाहिजे त्याविरुद्ध बोलले पाहिजे.समाजातील जात निहाय घटक जसे कि ब्राह्मण मातंग चांभार मराठा माळी धनगर कोळी इत्यादी या सर्वानीच आपआपल्या जाती विसर्जित करून केवळ आपण हिंदू आहोत हीच एक व्यापक ओळख ठेवावी असे आवाहन मोहन भागवत का करत नाहीतअसे केले तर खरी समरसता जी त्यांना अभिप्रेत आहे ती रुजण्यास मदतच होईल. एकीकडे भेदाभेद पाळू नका म्हणायचे आणि दुसरीकडे सर्वात जास्त आरक्षण उपभोगणारा हिंदूधर्मातीलच मागास वर्गाच्या आरक्षणाची समीक्षा करायचा आग्रह धरायचा.हा बुद्धिभेद संघच करू जाणो.आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तीन उदात्तमुल्ये या अगोदरच स्विकारली आहेत संघाला हेच नको आहे.त्यामुळे संघाला आणखी वेगळी समरसता कशाला हवी आहेसंघ राजकीयदृष्ट्या राज्यघटना मानत असला तरी धार्मिकदृष्ट्या मानत नाही.याचा अनेकदा प्रत्यय आलेला आहे.जो भाजपा आज सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळा उभारतो आहे त्याच सरदार पटेलांनी इ.स.१९४८ मध्ये संघावर गांधी हत्येमुळे बंदी घातली होती. संघात महिलांनाही प्रवेशबंदी आहे.महिलांसाठी संघाने वेगळी राष्ट्र सेविका समिती काढलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुरुष स्वयंसेवक असतात म्हणजे स्वइच्छेने काम करतात तर महिलांना सेविकेचा धर्म निभवावा लागतो. संघाचे संचालन असले कि या सेविका रस्त्याच्या कडेने रांगोळ्या काढण्याचे काम करतात. महिलांवरील बलात्काराच्या घटना इंडियामध्ये जास्त होतातभारतात नव्हेअसे वादग्रस्त विधान आसाममधील सिल्चर येथे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होतेच.हि पुरुषसत्ताक मानसिकता संघासाठी चुकीची नाही कारण संघ हिंदुत्ववादी पुरातन रूढी परंपराच समाजात रुजविण्याचे काम करतो आहे.
संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत. या टीकेला समाधानकारक उत्तर देणे संघाला आजही जमलेले नाही. संघाला स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वजही मान्य नाही.त्यांच्या शाखेत केवळ भगवा ध्वजच फडकावण्याची परंपरा आहे.कालही शिवशक्ती संगम कार्यक्रमात केवळ भगवा ध्वज फडकवला गेला.

यासर्व बाबी लक्षात घेता संघाची वाढत जाणारी ताकद हि पुरोगाम्यांना आव्हान देत अडचणीची ठरणार आहे.त्याच बरोबर इथल्या सोशल फॅब्रिकला पुन्हा वार करत उसविणारी ठरेल,सामाजीक आणि राजकीय घुसळण एका आणखी वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीत परावर्तीत होण्याची शक्यता जास्त आहे.
यामुळे इथल्या पुरोगाम्यांची अवस्था निर्णायक वळणावर येवून ठेपली आहे.पुरोगामी म्हणले कि फुले-शाहू-आंबेडकरवादीलोकशाहीवादीसमाजवादीगांधीवादीकम्युनिस्ट या प्रवाहांतील संघटनाव्यक्तीपक्ष यांचा समावेश होतो. पुरोगामी चळवळ संघटना यांच्यातील समन्वयाचा अभाव,एकमेकांविषयी असणारे संशय,वैचारिक मतभिन्नता,मरगळ निरुत्साह यामुळे जी सामाजिक वैचारिक पोकळी निर्माण झाली,आणि सांघिक स्तरावरील एकात्म भावनेचा अभाव निर्माण झाला नेमका तोच मुद्दा पकडून संघशक्तीने हि पोकळी भरून काढायचा प्रयत्न सुरु केला आहे. पुरोगामीसमूह एकमेकांवर कुरघोड्या करणे टिका करणे कधी इतरांपेक्षा गांधीना महान संबोधणे मार्क्सला ग्रेट म्हणने आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांना केवळ गरजेपुरते वापरून घेण्याचे काम करत आले आहेत. परस्परांशी सलोखा न ठेवल्यामुळे वैचारिक मतभेद तीव्र होत दरी वाढत चालली आहे.याचा पुरेपूर उपयोग संघाने केलेला दिसतो. संघाचे जे काही अजेंडे राबविणे चालू आहे ते देशाच्या एकात्मतेला हादरा देणारे ठरणार आहेत.धर्मधीष्ठीत समाजरचना निर्माण करून पुन्हा इथे चातुर्वर्ण्यव्यवस्था लागू करणे हि सत्ताधारी व ब्राह्मण्यवादी घटकांची धडपड आहे.यात विविध पुरोगामी पक्ष,समुहात घुसखोरी केलेले लोकही आहेत.घटनाप्रणीत समता,न्याय,बंधुता या मुल्यधीष्ठीत असलेला आधुनिक समाज यांना नको असतो तर विषमतेवर आधारलेला सनातन समाज त्यांना पुन्हा हवा आहे.यासाठी वेळीच सावध होत पुरोगामी चळवळीनी आळस झटकून पुन्हा एकदा जोमाने काम सुरु केले पाहिजे.

-    मिलिंद धुमाळे 

Translate