बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बुलेट ट्रेन

भाजपा सरकारने मतदारांनी निवडून देण्यासाठी प्रचारसभा आणि अनेक घोषणांमध्ये इथल्या गरीब,मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लब्धप्रतिष्ठीत अशा सर्वांनाच अनेक भुरळ पाडणारी आश्वासने दिली.आमचे सरकार निवडून दिलेत तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.लाखो तरुणांना रोजगार नोकरी उपलब्ध करून दिला जाईल.वगैरे हि केवळ आश्वासनेच राहिली हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीच अमलांत आलेलं नाही.
यापैकी एक आश्वासन म्हणजे बुलेटट्रेन हि सरकारची बहुचर्चित महत्वाकांक्षी योजना आहे.यासाठी भारत सरकारने (भारतीय रेल्वे) जापान इंटरनेशनल कॉर्पोरेशन एजेंसी (जेआईसीए) यांच्यात करार केला आहे.यासाठी जपान सर्व मदत करण्यास तयार आहे.ट्रेन्स बोग्या, ट्रेक्स आणि संचालनपद्धती आणि  इतर आवश्यक उपकरणे जपान उपलब्ध करून देणार आहे.सदर योजनेचा सध्याचा अंदाजे खर्च ९८ हजार करोड रुपये अपेक्षित आहे. देशातील हि पहिली बुलेटट्रेन मुंबई ते अहमदाबाद (गुजरात) अशी धावणार आहे.

भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेवर आली आहे त्यांनी व्यापक लोकहिताचे निर्णय न घेता अनेक चुकीचेच निर्णय घेतले असल्याचे जाणवते.
अनेक प्रकारच्या बंद्या आहेत.अनेक नविन कर आहेत.यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.
केंद्राचे स्वत:चे म्हणजे दिल्ली राज्याचे या वर्षीचे २०१५-२०१६ चे बजेट ४१५०० करोड रुपये.महाराष्ट्र राज्याचे २०१५-१६ चे वार्षिक बजेट ५४ हजार ९९९ कोटी रुपये आहे.हि दोन प्रमुख राज्ये म्हणून महत्वाची आहेत, यासाठी त्यांचे  उदाहरण वानगीदाखल दिले आहे.या दोन राज्याच्या एका वर्षाचा आर्थिक बजेट पाहिला आणि बुलेटट्रेनच्या अंदाजित खर्चाचा आकडा पाहिला तर तफावत स्पष्ट दिसते.
बुलेटट्रेनचा खर्च दोन मोठ्या राज्यांचा एक वर्षच्या आर्थिक अर्थ संकल्पाच्या कितीतरी पट जास्त आहे.

मुळात भारत हा विकसनशील देश आहे.इथे कित्येक वर्षे नागरिकांना अजूनही पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.
मागे दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी एका भाषणात म्हणाले होते कि भारतातील पन्नास हजार गावात आजही रस्ते पाणी नाहीत वीज नाही.भारतातील अर्धी अधिक जनता आजही भयानक गरीबी उपासमार कुपोषण बेरोजगारीने त्रस्त आहे.अर्धा भारत उपाशी पोटी निजणारा आहे जो बेघर आहे.फुटपाथ हाच त्याचा आसरा आहे.
आधुनिकता आणि तिचे फायदे हे सर्वांनाच हवेसे असतात.अगदी टोलेजंग टॉवरमध्ये राहणारे असोत कि झोपड्या फुटपाथवर राहणारे असोत, आधुनिक सुख सुविधांचे आकर्षण सर्वांनाच आहे.
मात्र आपण प्राधान्यक्रम कशाला द्यायचा हे सरकारने ठरवायचे असते.मेट्रो ट्रेन आली.खूप गाजावाजा झाला.सुरुवातीला काही दिवस तिचे २० रुपये रिटर्न तिकीट होते.त्यामुळे तिला भरघोस प्रतिसाद मिळत होता.अनेक गरिबांनी मध्यमवर्गीयांनी त्यावेळी मेट्रोने प्रवास केला.आज त्याच गरिबांना ती मेट्रो परवडत नाही.त्यांना बेस्टच्या बसनेच पूर्वीसारखा प्रवास करावा लागत आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.जे उच्चपदस्थ आहेत असाच सधन वर्ग अशा सोयी-सुविधांचा लाभ घेताना दिसतो आहे.रिलायन्स दर सहा महिन्यात भाववाढ करा म्हणून न्यायालयात जातेय.सदर सुविधा फक्त धनाढ्य लोकांसाठीच बनविण्यात आली आहे काय? गरिबांना या सुविधेचा फायदा का घेता येत नाही याची समीक्षा होणार कि नाही?
बुलेटट्रेनचा सध्याचा अंदाजे खर्च जो कि ९८ हजार करोड रुपये आहे. त्याच्या दररोजच्या व्याजापोटीच १.३७० करोड रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. सदर बुलेटट्रेनचे काम हे २०१७ ते २०२३ या सहा वर्षात पूर्णत्वास येईल असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अर्थात आपल्या देशातील अनेक प्रकल्प हे कसे आणि किती वर्षे रेंगाळत पूर्ण होतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.त्यामुळे हा अंदाजे खर्चाचा आकडा आणखी फुगण्याची शक्यता जास्त आहे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद या प्रवासाठी ट्रेनचे सर्वाधिक दर प्रथमश्रेणी भाडे शताब्दी एक्स्प्रेससाठी १९२० रुपये आहे. तोच विमानप्रवास भाड्यापोटी १७२० रुपये मोजावे लागतात.
बुलेटट्रेनचे सुरुवातीचे भाडे किती असेल हे अजून ठरलेले नाही.मात्र ते यापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.
शिवाय तो खर्च भरून काढण्यासाठी तेवढी प्रवासी संख्याही असायला हवी. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर एवढे प्रवासी उपलब्ध होतील काय? हा खरा प्रश्न आहे. 
आणि तो गरीबमध्यम वर्गीयांना परवडणार आहे काय?
हिरा व्यापारी आणि कापड व्यापारी यांची संख्या विचारत घेतली तरी ती समाधानकारक भरत नाही.त्यामुळे बुलेटट्रेन हा सफेद हत्ती ठरेल कि काय अशी दाट शंका इथे निर्माण होते.
 एकीकडे आजारी बंद पडलेले सरकारी उद्योगसमूहादी प्रकल्प सरकार बंधन मुक्त करत त्याचे खाजगीकरण करत आहे 
तर दुसरीकडे असे अवाढव्य प्रकल्प राबवून आपल्याच निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
आहे त्या सरकारी उद्योगांना प्रकल्पांना चालना देवून त्यांचे पुनरुज्जीवन करायचे सोडून सरकार हातचे सोडून पळत्याच्या मागे लागले आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे. या निर्णयामुळे सरकारने गरीबीची क्रूर थट्टा चालवली आहे असे वाटते. फ्रांसची राणी "ब्रेड मिळत नाहीत तर केक खा" असे म्हणाली होती हे जगप्रसिद्ध वाक्य आपल्या देशात अनेक गोष्टीत लागू होते. मध्यमवर्गीय गरीबांच्या डोळ्यातील स्वप्ने चकनाचूर करत धडधडत सुसाट धावणारी बुलेटट्रेन किती शेतकर्यांना आत्महत्या करण्यासाठी फायदेशीर ठरेल हे येणारा काळ ठरवेल.सामान्य माणसाने केवळ आपल्या अस्तित्व संपत जाणाऱ्या या आणि अशा अनेक अंकी नाटकाचे प्रेक्षक बनून साक्षीदार व्हायचे. मेक इन इंडियाच्या गोंडस नावाखाली. स्मार्ट सीटीच्या रेट्याखाली अनेक मध्यमवर्गीय शहरी ग्रामीण आदिवासी कुटुंबे प्रभावित होत संपून जातील.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी सरकारकडे पैसा नसतो तेच सरकार कधी परदेशात निधी सढळ हाताने देते.
तर कधी धनदांडग्यांच्या पंचतारांकित सोयीसाठी अशी कर्जे  काढते. 
सोन्याची सुरी ऊरी मारून घेण्याचा हा प्रकार आहे.
कर्ज काढून वेगाची मजा घेण्याचे सोहळे साजरे करण्याची हौस नक्की कशासाठी आणि कुणासाठी?

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी विशेष २०१५

६ डिसेंबर १९५६ रोजी एक धगधगता ज्वालामुखी अरबी समुद्राच्या काठावर शांत झाला.
दिल्ली २६ अलीपुर रोड या निवासस्थानावरून त्यांचे पार्थिव विमानाने रात्री सव्वा तीन वाजता मुंबईला आणण्यात आले. विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचे पुष्पाच्छादित पार्थिव बाहेर येताच विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो स्त्रि-पुरुषांना रडू कोसळले दु:ख अनावर झाले.वातावरण अतिशय शोकाकुल आणि गंभीर असल्यामुळे उपस्थितांपैकी कुणीतरी सूचना केली कुणीही कोणत्याही घोषणा देवू नयेत.आणि सांताक्रूझ येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली.
बाबासाहेबांचा चेहरा दिसावा म्हणून अम्बुलंसमध्ये खास प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात आली होती.सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलांचे अंतर हजारो मैलाचे वाटू लागले होते.इकडे राजगृहाजवळ लाखो लोक रात्रीच जमायला सुरुवात झाली होती.त्यावेळी मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हते टेलिफोनही नव्हते आणि तरीही बाबासाहेबांच्या मृत्यूची खबर देशभर वाऱ्याच्या वेगाने पसरली.देशभरातून आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून लोक मिळेल त्या वाहन साधनाने दादर गाठत होते.एकमेकांना धीर देत होते. हे एक अभूतपूर्व कोडेच. जमलेले लोक सतत बुद्धम शरण गच्छामि म्हणत हात जोडून प्रार्थना करत होते.अन्नपाण्यावाचून बसलेल्या लोकांच्या डोळ्यातून धारा मात्र थांबत नव्हत्या.
ज्याने हजारो वर्षे गुलामगीरीच्या अमानवीय अस्पृश्यतेच्या शोषणाच्या आणि माणुसकी नाकारणाऱ्या धर्म व सामाजीक अशा व्यवस्थेला सुरुंग लावत पशुवत आयुष्य कंठनाऱ्या शुद्राती शूद्रांना माणसात आणले.आज तो लाखोंचा पोशिंदा मार्गदाता शांत झाला होता.चिरनिद्रा घेत होता.
खरेतर ज्यांच्या स्पर्शाने सावलीने विटाळ होतो अशा खुळचट आणि बालिश रूढी प्रथा पाळणाऱ्यांच्या धर्माचा आणि सामाजीक व्यवस्थेलाच मोठ्या करुणामय अंतकरणाने शुद्ध केले. अशा महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महापरिनिर्वाण दिन.करोडो भारतीयांच्या आयुष्यातील एक दु;खद दिवस.
एका युगपुरुषाच्या युगाचा अंत झाला .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त.म्हणून जेव्हा घटना लिहायला इथल्या विद्वान आणि गुणी अशा बुद्धिमत्तेच्या कुलुपाच्या चाव्या ज्यांच्या कमरेला लटकलेल्या असायच्या अशा लोकांनी जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायला नकार दिला.परदेशी घटनातज्ञ व्यक्तीने कंत्राटी पद्धतीने घटना लिहिली असती तर देशावर नामुष्की ओढवली असती. असे घडू नये म्हणूनच देशाची बदनामी टाळण्यासाठी त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली.
प्रचंड बुद्धिमत्ता फर्डे वक्ते आणि सर्वसमावेशक अशी दूरदृष्टी असलेला नेता भारताला लाभला हा भारताचा बहुमान.
बाबासाहेबांच्या ज्ञानाच्या कक्षा परीपेक्ष हे फार उत्तुंग आणि मोठे होते.
आज महाराष्ट्र आणि देशही दुष्काळाच्या चिंतेने व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येने हळहळतो आहे. बाबासाहेबांनी १९३८ सालीच यावर उपाययोजना सुचवल्या होत्या. स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी “खोती” पद्धत बंद करणारे बिल कायदेमंडळात दाखल करून ती पूर्णतः बंद केली.त्या वर्षीच्या “जनता”च्या अंकात बाबासाहेबांनी यावर संदर्भात एक लेखच लिहिला होता.”शेतकरी बंधुनो तुमची दु:खे अनेक आहेत.ती दूर करण्यासाठी तुम्हीच कंबर कसली पाहिजे.शेतकर्याच्या मानेभोवतालचे सावकारी पाश दूर करण्याकरिता आणि सावकारशाहीस आळा घालणारेदुसरे बिल आम्ही मंत्री मंडळात सादर करणार आहोत.तुमच्या सामाजीक भेदाचा फायदा घेऊन तुंचे शत्रू तुमची एकी होऊ देणार नाहीत.तरी याबाबतीत कुणबी,मराठे,महार,चांभार, वगैरे सर्वांनी शेतकरी तेवढा एक आहे,असे समजून आपल्या हिताच्या आड कुणाला येवू देवू नका.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीहि उपाय सुचविताना बाबासाहेबांनी सांगितले कि “शेती हा राष्ट्रीय उद्योग असेल,सामुहिक शेती (कलेक्टीव्ह फार्मिंग)करावी लागेल.शेती विमा,नदीजोड प्रकल्प,दामोदर व्ह्याली योजनेच्या माध्यमातूनच पुढे त्यांनी भाक्रानांगल योजना तयार केली.बाबासाहेबांच्या या कृषीविषयक योजनांची इमानदारीने अमलबजावणी केली तर शेतकर्याच्या आत्महत्येचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
राजकीय दुष्टीकोनातून त्यांनी इंग्लंडमध्ये १९३१ साली गोलमेज परिषदेत अस्पृश्य समाजाच्या स्वतंत्र मतदार संघाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला.आणि मतदार संघ पासहि करून घेतला,मात्र त्यावेळीमहात्मा गांधीना हि कृती समजली नाही त्यामुळे त्यांना हे हिंदू धर्माचे विभाजन वाटले त्या चुकीच्या अर्थातून त्यांनी त्या विरोधात आमरण उपोषण केले.गांधीजींच्या या उपोषण दबावामुळे एक समझोता झाला.आणि स्वतंत्र मतदार संघाऐवजी अस्पृश्यांना आरक्षित जागा देण्यात आल्या.त्यालाच “पुणे करार” असे म्हणतात.या कराराप्रमाणे अस्पृश्यांना आपला उमदेवार निवडण्याचा अधिकार संपुष्टात आला.सर्वच मतदारआरक्षित जागेसाठी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडू लागले.
यामुळे अस्पृश्य समजाच्या आयुष्यात जी संभाव्य सर्वांगीण क्रांती निर्माण होणार होती ती झाली नाही.
परंतु बाबासाहेब हार माननार्यापैकी नव्हतेच त्यांनी आरक्षणाची तरतूद करून मागासवर्गीय समूहांच्या हक्कअधिकाराचे रक्षण केले.आज आरक्षणाचा विषय अनेकदा चर्चेला येत असतो,गंमत म्हणजे जे आरक्षण लाभार्थी समूह आहेत तेही अज्ञानातून आरक्षण संकल्पनेला विरोध करत असतात.वास्तविक सर्वात जास्त आरक्षण मिळविणारा वर्ग हा ओबीसी आहे.आणि तरीही हा वर्ग कधी त्याच्या विरोधात असतो तर कधी उदासीनतेमुळे आणि जातीय दृष्टिकोनातून आरक्षण लढ्यात उतरत नाही.आणि ज्यांना केवळ साडेतीन पूर्णाक टक्के आरक्षण आहे तो आंबेडकरी समाजाच सर्वात जास्त संवेदनशील आणि जागरूक होवून रस्त्यावर उतरताना दिसतो आहे.
बाबासाहेब धर्माराच्या मुद्याबाबत अत्यंत संवेदनशील होते गंभीर होते.धर्मांतरासंबंधी त्यांनी केलेली मीमांसा लक्षणीय आहे.ते मुक्ती कोन पथे या अग्रलेखात म्हणतात “धर्मांतर हा मौजेचा विषय नाही.हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे.जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात नेण्याकरीता नावाड्याला जेवढी पूर्व तयारी करावी लागते तेवढीच पूर्व तयारी धर्मातरा करिता करावी लागणार आहे.” धर्म आणि धम्म याची तुलना करताना ,जिथे धर्म संपतो तिथून धम्म सुरु होतो.धर्माचा संबंध देवाशी आहे तर धम्माचा संबंध मानवाशी आहे.दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर धर्मात देवाला स्थान आहे तर धम्मात मानवाला केंद्रबिंदू मानले आहे.धर्माची संकल्पना देवाशिवाय पूर्ण होत नाही तर धम्माच्या संकल्पनेत त्या व्यवस्थेला स्थानच नाहीं.धर्माच्या संकल्पनेत “ईश्वर” आणि “आत्मा” अटळ आहेत.
याशिवाय धर्म संकल्पना पूर्ण होत नाही,मात्र धम्मामध्ये “ईश्वर” आणि “आत्मा” यांचे अस्तित्वच नाकारलेले आहे.यासंदर्भात “धम्मचक्क प्रवर्तनसुत्त”म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या पहिल्याच उपदेशात बुद्ध म्हणतात.”आपला जो मार्ग आहे जो धम्म आहे,त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्त्यव्य नाही,त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही,तसेच धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही” बुद्धाचा हा विचार अथवा त्याचा धम्म हा केवळ हिंदू धर्मावर इलाज नाही तर जगातील सर्वच “धर्म” म्हणून ज्या सन्कल्पना आहेत त्या समग्र संस्थेवरील अंतिम इलाज आहे.ज्यामध्ये केवळ मानावाचे हित पाहिले गेले आहे.यामुळे खुप अभ्यास आणि विचारांती तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर टिकणारा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि त्यांच्या अनुयायांनाही त्याची १९५६ साली दीक्षा दिली.त्यानंतर लगेचच बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले.बाबासाहेबांना जावून आज ५९ वर्षे झाली.त्यानंतर त्यांचा पोरका झालेला समाज व्यक्तिगत पातळीवर संघर्ष करून प्रगती साधतो आहे.राजकीयदृष्ट्या अतिशय वाईट अवस्था असताना अतिशय चिवटपने स्पर्धेत टिकून राहणे हे तो शिकला आहे.परंतु काही गोष्टी या सरकार पातळीवरच शक्य होत असल्यामुळे आणि  राजकीय नेतृत्व सक्षम नसल्यामुळे अनेक गोष्टीत काही ठिकाणी या समजाला अडवणूक सहन करावी लागते आहे.प्रसारमाध्यमे आणि इथली प्रस्थापितव्यवस्था मुद्दाम असे नेतृत्व सतत पुढे करतो कि ते समजाला न्याय देवू शकणार नाही.संसदेत जेव्हा आपले म्हणने समाजाचे प्रश्न आणि व्यथा मांडायची वेळ येते तेव्हा समाजाचे नेतृत्व म्हणून तिथे गेलेले लोक विधायक गोष्टीवर बोलण्यापेक्षा कविता बोलून उपस्थितांचे मनोरंजन करत असतात,हे अत्यंत घातक आणि लाजिरवाणे आहे.आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग अशा पद्धतीने वाया घालवला तर आपल्याला पुन्हा समाजात जावून कोणत्या तोंडाने मत मागण्याचा पाठिंबा मागण्याचा अधिकार उरतो याचा संबंधित नेतृत्वाने विचार करायला हवा.बाबासाहेबांचे इंदुमील मधील स्मारक ,इंग्लंड मधील स्मारक यांचे भावनिक भांडवल करत दोन्ही आघाड्यांनी आंबेडकरी जनतेला खेळवले आहे.वास्तविक आता आंबेडकरी जनतेनेच सांगायची गरज निर्माण झालेली आहे कि आम्हाला जगातील सर्वात मोठे पुतळे आणि स्मारके बागा प्रेक्षणीय स्थळे नको आहेत.आम्ही भावनिक बनून भक्त म्हणून जगत नाही.. आंबेडकरी जनता विवेकवादी आहे,विचारी आहे.
बाबासाहेब हे विश्व वंदनीय आहेत सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत तशा अनेक पदव्या त्यांना विदेशातून मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत,परदेशातही त्यांचे पुतळे आहेत.त्यांच्या उत्तुंग कामाची देश-विदेशात दखल घेतली जात आहे.आता गरज आहे ती मुलभूत हक्क अधिकारांची.सरकार त्यावर खर्च करत नाही मात्र स्मारक पुतळे उभारून भक्तसंप्रदाय वाढवत आहे.
एकीकडे आरक्षण संपविण्याचे कारस्थान चालू आहे तर दुसरीकडे सरकारी शाळा-कॉलेज मोठ्याप्रमाणावर बंद केले जात आहेत.खाजगी शिक्षणसम्राटाना शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करून शिक्षण महाग केले जात आहे.
केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण हे खरे तर मोफत दिले गेले पाहिजे.परंतु असे होताना दिसत नाही,
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि औषध-उपचारावर होणारा भरमसाठ खर्च हे सर्व पाहता इंदुमिलच्या ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असे गरिबांसाठी सरकारी सुसज्जहॉस्पिटल किंवा केंब्रीज ऑक्सफोर्डच्या धर्तीवरील मोठे सर्व शाखांचे असे सरकारी महाविद्यालय निर्माण केले पाहिजे.याद्वारे बाबासाहेबांच्या उर्वरित कार्यासही हातभार लागेल आणि या माध्यमातून त्यांची स्मृती निरंतर राखली जाईल.
क्रांतीसुर्याच्या चिरतरूण वैचारिक चळवळीस विनम्र अभिवादन !! जयभीम !!

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

पुरोगामी VS प्रतिगामी आणि मुस्लीम समाजाची मानसिकता

पुरोगाम्यांवर प्रतिगामी वर्तुळातून नेहमीची होणारी टीका म्हणजे पुरोगामी केवळ हिंदू धर्मावर टीका करतात,मुस्लिम धर्मावर टीका करत नाहीत.हे खरे नसते हे सर्वांना माहित आहे अगदी असे मत मांडणाऱ्यांना देखील.त्यामुळे आता बोला.आता बोला.असा धोशा प्रतिगामी वर्तुळातून लावला जातो आहे.तोपर्यंत यावर पुरोगामी वर्तुळातून टीकेची झोड उठली देखील होती.
आपण इतरांच्या चुकाच दाखविण्यात आघाडीवर असतो त्यामुळे हे लक्षात कोण घेतो?
लोकमत वृत्तपत्राच्या मंथन पुरवणीत इसीसचा पैसा आणि त्या संबधित लेखात वादग्रस्त पिगी बँक कार्टुनचा उपयोग ग्राफीक्स डिझायनरने केला. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असे म्हणत मुस्लिम धर्मियांनी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करत निषेध व्यक्त केला. या हिंसक निषेध करणाऱ्या जमावाचा कडक शब्दांत निषेध पुरोगाम्यांनी केलेला आहे.हे कृत्य बिलकुल पटलेले नाहीभावना दुखावल्या ठीक आहे.कशासाठी?त्यावर ‘अल्लाह रसूल मोहम्मद’ नाव होते म्हणून.ती भावना खरी असेल तर निषेधाचा संविधानिक मार्ग आहे.कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा कोणत्या निषेधाचा मार्ग आहेअसा कायदा हातात घेणे योग्य आहे काय लोकमतनेही तातडीने माफी मागत सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो ही संशयास्पद आहे.त्यातही आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे वाईट आहे.तुम्हाला जर पूर्वकल्पना होती तर असा प्रकार करायची गरज नव्हती.अन्यथा आपल्या कृत्यावर शेवटपर्यंत ठाम रहायला हवे होते.
मुळात एक गोष्ट मुस्लिम समुदायाने लक्षात घ्यायला हवी देशातील वातावरण खराब आहे याप्रसंगी आपण सर्वांनी फार गांभिर्याने वागले-बोलले पाहिजे.असहिष्णुतेचे वातावरण असताना राष्ट्रगीताला उभे राहण्यास नकार देणे हे आगीत तेल ओतण्यासारखे आहे.ज्यांना शारीरिकदृष्ट्या जमणारे नव्हते त्यांना सोडून इतरांनी तरी उभे राहणे हे त्याप्रसंगी गरजेचे होते.अर्थात त्यांना तेव्हा राष्ट्रगीत चालू असताना आग्रह करणारे.त्याचा व्हिडिओ बनविणारे हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत.त्यांना बाहेर हुसकावून लावणाऱ्यांचा देखील निषेध केला पाहिजे.राष्ट्रगीताला उभे रहावे असा कायदा नाही.तर ती नैतिकता आहे.ती पाळणे हा सभ्यपणा आहे ती पाळायची कि नाही हा आपला प्रश्न.मात्र अशा वातावरणात उगाच आणखी पेच निर्माण करून वातावरण खराब करणे टाळले पाहिजे.
इस्लामिक स्टेटचा क्रूर दहशतवाद जगप्रसिद्ध असताना आपण त्या संबंधातील बातमीसाठी असे पाऊल उलणे हे आपल्याला अडचणीत आणनारे ठरेल असे वाटले नाही कायअनेक वृत्तपत्रांनी इस्लामिक स्टेटच्या समर्थनार्थ मुस्लिम रस्त्यावर’ असे बातमीचे वार्तांकन केले आहे.याचे भान किती मुस्लिमांना आहेया आंदोलनाने भारतीय समाजात चुकीचा मॅसेज गेला.पिगी बँक म्हणजे पैसे साठविण्याच्या उपयोगी येणारे साहित्य आहे.ते जगभरात उपलब्ध आहे.त्याचे काय करायचे?आजच्या आधुनिक युगात त्यावर नाव आल्याने भावना भडकण्याची खरेतर गरज होती असे मला वाटत नाही.आपल्या धार्मिक भावना इतक्या ठिसूळ कावर्तमान पत्र आणि त्यातील चित्राचा जीव काही तासांपुरता असतो संध्याकाळ झाली कि वर्तमानपत्र रद्दी होते.त्याचे आयुष्य,अस्तित्व संपून जाते.ते दुर्लक्षित केले असते तर कुणाला काहीच कळले नसते.आपला धर्म आणि धार्मिक प्रतीके इतकी टोकदार का आहेत?
दुसरे म्हणजे इस्लामिक स्टेटच्या झेंड्यावर तीच नावे आहेत.कुणाची अमानुषपणे कत्तल करण्याआधी ते जोरजोरात अल्लाह हु अकबर” म्हणत असतात.
याचा आपण कधी रस्त्यावर उतरून निषेध केलाय कामी आजवर पाहिलेले नाही.
इस्लामिक स्टेट आणि इस्लामचा संबंध आहे कि नाहीभारतीय मुस्लिमांची त्याबाबत अधिकृत आणि सर्वमान्य भूमिका काय आहेआपली मुले तिकडे आकर्षित का होतातआणि मला अनेकदा पडलेला प्रश्न जगभरातील मुस्लिम समाजाचे भारतीय मुस्लिम समाजाला काय पडले आहे? काय संबंध आहे तुमचाजगातील इतर मुस्लिम देशात कुणावर अन्याय अत्याचार झाला तर त्याचा निषेध भारतात काहे आता कळेनासे झाले आहे. यात मानवतावादी दृष्टीकोन मानायचा तर नुकत्याच पेरीसवर झालेल्या हल्ल्यासाठी कुठेही मानवतावादी दृष्टीकोन पहायला मिळाला नाही. रझा अकादमीने केलेल्या उन्मादाचा बट्टा ठळकपणे उमटलेला आहे.सिरीयात तिकडच्या मुस्लिमांना त्रास त्यासाठी तुम्ही इस्लामिक स्टेटच्या युद्धात सहभागी व्हायला जाणार आहात?
तुमची ओळख भारतीय म्हणून आहे कि जागतिक मुस्लिम म्हणून आहेउद्या त्याचे लोण इथे आले तर काय करायचेयाची किमंत सर्वांनाच आणि पर्यायाने देशाला फार मोठी चुकवावी लागेल.यातून जे प्रश्न विचारले गेले आहेत ते शिकलेल्या पुरोगामी आणि प्रगल्भ मुस्लिम मित्रांना त्यांनी यावर गंभीरपणे चर्चा करायला हवी.निर्णय घ्यायला हवा.जसे सर्वच हिंदू वाईट नसतात तसे सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.कट्टरपंथीय आणि पुरोगामी यात फरक केलाच पाहिजे.
आज समाजाला धर्माची गरज नाही तर चांगले शिक्षण आरोग्य आणि जगण्यासाठी नोकरी व्यवसाय या मुलभूत हक्क अधिकारांची गरज आहे. त्यासाठी लढले पाहिजे.
धर्म-जात या खुळचट संकल्पनाच हळूहळू बाद करत गेले पाहिजे. अर्थात सगळेच धर्म.
वेगळे धर्म वेगळे पंथ वेगळी ओळख हे सर्व कुठवर जोपासायचेसर्वाचा एकच धर्म एकच पंथ "भारतीय" म्हणून आपण विकसित नाही का करू शकतनिदान भारतापुरते तरी?
इस्लामिक स्टेटबद्दल भारतीय मुस्लिमांचे वाढणारे आकर्षण चिंताजनक आहे.




रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

धर्मनिरपेक्षतेची गोची आणि घटना बदलण्याचे कारस्थान

संविधान दिन २६ नोव्हेंबर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकसभेत २ दिवस संविधान गौरव दिन व बाबासाहेबांच्या विचारांची आर्थिक सामाजीक राजनीतिक विषयावरील मतांवर चर्चा करण्यात आली.
संविधान आणि बाबासाहेब याबद्दल कट्टरपंथीय आणि उघड धार्मिक राजकारण करणारे पक्ष संघटना यांना जेव्हा उमाळा दाटून येतो तेव्हा तो नक्कीच कोणत्यातरी हेतूने प्रेरित असतो यात शंका घ्यायचे कारण नाही. भारतीय जनता पार्टी (BJP) त्यांची मदर संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांच्या परिघावरील इतर संघटना म्हणजे इतर कट्टरहिंदुत्ववादी संघटना, शिवसेना यांना “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचे आणि त्या शब्दातीत संकल्पनेचे अतोनात वावडे आहे.हे सर्वश्रुत आहे. या अगोदर संसदेच्या सदनाबाहेर काही गोष्टींबाबत विरोध केला जात होता,पूर्वी तो आवाज दबका होता,मग हळूहळू तो टोकदार झाला अलीकडे तो उच्चरवात उन्मादी झाला आहे.काल तो विरोधाचा सूर थेट भवनात आळवला गेलाय.हे कुणाच्या लक्षात आलेय कि नाही?

आपल्याकडे “धर्मनिरपेक्ष” म्हणजे इंग्रजीत “सेक्युलर” या अर्थाने घेतले जाते हे दोन्ही शब्द कट्टरहिंदुत्ववाद्यांनी आपल्या देशात इतके बदनाम केले आहेत कि आता ती शिवी वाटू लागली आहे.
यासाठी धर्मनिरपेक्षतेचे या लोकांना वावडे असण्याचे कारण काय हे जाणून घ्यावे लागते
धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हि संकल्पना अगोदर आपण समजून घेतली पाहिजे.
धर्मनिरपेक्षता याची फोड अशी - धर्म+निरपेक्षता.
“धर्म” हा मानवी जीवनातील नीतीनियम मूल्यांची एक ढोबळ चौकट म्हणून आपण धारण करत असतो. खरेतर धर्म हा व्यक्तिगत बाबीत मोडणारा आहे.धर्म हि वैयक्तिक धारण करायची खाजगी गोष्ट ती पाळायची किंवा मिरविण्याची गोष्ट नाही.धर्माचे दृश्यमान स्वरूप नसल्यामुळे तो सार्वजनिक जीवनात भौतिक पद्धतीने पाळण्याची धारण करण्याची गरज नसते. परंतु सार्वजनिक जीवनात समानधर्मीय एकत्र येतात तेव्हा समुहाचा समूहधर्म होतो.सावर्जनिक होतो.
सार्वजनिक जीवनात आपण वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा विशिष्ट धर्म धारण केलेली व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जात नाही तर त्या व्यक्तीची ओळख केवळ एक माणूस म्हणून असते. धर्माचे दृश्यमान स्वरूप नसल्यामुळे आणि त्याकाळात टोळीयुद्ध परकीय आक्रमण आणि परस्परांविषयीची असुरक्षिततेची भावना त्यातून निर्माण झालेली भीती या गरजेतून धर्माची दार्शनिक प्रतीके निर्माण झाली.विशिष्ट परमेश्वर देवांच्या संकल्पना प्रतीके प्रतिमा निर्माण झाल्या,विशिष्ट धर्म धारण करणाऱ्याचे विशिष्ट धार्मिक पेहराव निर्माण केले गेले.सांकेतिक सण उत्सव आणि त्याअनुषंगाने एक धार्मिक संस्कृती निर्माण झाली ज्याद्वारे ती व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे हे चटकन ओळखता यावे.याचबरोबर धर्म हि वैयक्तिक खाजगी गोष्ट न राहता ती मोठ्याप्रमाणावर सार्वजनिक झाली,सामुहिक झाली.ती असुरक्षिततेच्या भावनेतून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी.सोबत हे नीतीनियम वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात वरचढ ठरू लागले.
धर्माचा मानवी जीवनात हस्तक्षेप वाढला आणि ती एक अदृश्य सार्वभौम संस्था बनली.
माणसासाठी धर्म कि धर्मासाठी माणूस इतपत पेच निर्माण झाला. धर्म हि संस्था स्वधर्मीय नागरिकांना आपल्या धार्मिक अधिपत्याखाली ठेवू लागली त्यामुळे सुरवातीचे खाजगी नीतीनियम आणि त्यांची मुल्ये हि आपल्या जन्म-मृत्यू विवाह,घटस्फोट,मालमत्ता आणि सार्वजनिक धार्मिक स्थळी मुक्त वावरण्याचे ठिकाण याबाबतीत धर्माने नियम घालायला सुरुवात केली आणि तेच अंतिम ठरू लागले..त्यानुसार त्या त्या धार्मिय लोकांना पालन करावे असा धार्मिक ‘आदेश’ रूढ होवू लागला.
याचा अर्थ सुरुवातीला वैयक्तिक खाजगी स्वरूपात धारण केला जाणारा धर्म सामाजीक व्यवहारात शिरकाव करून सर्व व्यवहाराचे नियंत्रण करू लागला.कोणत्या गोष्टी धर्माशी सुसंगत आणि कोणत्या गोष्टी धर्माविरुद्ध याची एक नियमावलीच तयार झाली.त्यानुसार व्यक्तीना ते पालन करणे हि “धर्माज्ञा”म्हणून रूढ झाली.हा धर्म आता एक टोकदार आणि अणुकुचिदार हत्यार झाला आहे.
राजकीय आणि सामाजीक व्यवस्थेत तो एक महत्वाचा घटक बनला आहे.
हे झाले धर्माबाबतचे स्पष्टीकरण.

“निरपेक्षता” विरक्ती, कोणतीही अपेक्षा,संबंध,महत्वाकांक्षा,उद्देश इत्यादी नसलेला असा याचा अर्थ होतो कोणत्याही धर्माचा संबंध नसणे,
धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माविरुद्ध नसणे किंवा कोणत्याही धर्माशी सलोखा नसणे
सर्व धर्म समान आहेत असे मानणे त्याबरोबरच देशातील सर्व धर्मीयांना सरकार प्रशासन समानतेची वागणूक देताना राष्ट्राचा कोणताही विशिष्ट धर्म असणार नाही याची काळजी घेईल
याबरोबर प्रत्येक व्यक्तीला इच्छेनुसार कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचीपंथांची ओळख जपण्याचा अधिकार असण्याची खात्री देणे
मात्र शासनाने एका धर्माला पक्षपाती असू नये. शासनाचा असा कोणताही धर्म असणार नाही.
याचा अर्थ आपले सरकारप्रशासनन्यायालयीन व्यवस्थाशिक्षण व्यवस्था,पोलीस प्रशासन आदी विशिष्ट धर्माच्या आधाराऐवजी व्यक्तीनागरिक यांच्या हिताच्या दृष्टीने व राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व प्रणालीवर चालल्या पाहिजेत.याचा अर्थ साधा आणि सरळ आहे कि कोणत्याही धर्मीय व्यक्तीला या धर्मनिरपेक्षतेबद्दल काहीही आक्षेप असण्याचे कारण नसायला हवे.
परंतु काही कट्टरपंथीय लोकांना हे सहन होत नाही, त्यांच्या समानधर्मीय लोकांची संख्या बहुसंख्य आहे म्हणजे तुलनेत इतरांपेक्षा जास्त आहे म्हणून या देशावर आपलीच धर्मसत्ता असायला हवी असे त्यांच्या मनात घाटत असते.इतर धर्मियांनी आमच्या मर्जीवर आणि मेहरबानीवर इथे रहावे अशी त्यांची इच्छा असते.हे तथाकथित कट्टरपंथीय लोक म्हणजेच वर उल्लेखलेले हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना.तर यांचे याबाबत काय म्हणने काय आहे ते पाहुया.

धर्मनिरपेक्षतेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी असे वक्तव्य केले कि “ भारताचे चरित्रसंस्कृती हीच मुळात धर्मनिरपेक्ष आहे. याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. त्यामुळे घटनेत सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्ष ) हा शब्द त्यांनी वापरला नव्हता. ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर धर्मनिरपेक्ष’ शब्दाचा समावेश करण्यात आला. या शब्दाचा गैरवापर झाल्याने पंथनिरपेक्षहाच शब्द वापरावा,
  
काँग्रेसचे सभागृहनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याच धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून थेट आर्य-अनार्य वादाला हात घालत दुसरा मुद्दा मांडला कि  
घटना निर्मात्यांना सेक्युलर’ शब्द हवा होता, परंतु त्यावेळी विरोध झाला होता, जसे कि हिंदू कोड बिलाला त्यावेळी विरोध झाला होता. असे ते म्हणाले.

इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि धर्मनिरपेक्षता (सेक्युलर ) हा शब्द तेव्हा घटनेत अंतर्भूत करण्यास ज्या लोकांनी विरोध केला तेच लोक आज पुन्हा त्याच शब्दाला विरोध करत आहेत. आणि त्यासाठी बाबासाहेबांनीच तो शब्द घातला नाही म्हणून त्यांची साक्ष काढत मखलाशी सुद्धा करत आहेत.आहे कि नाही गंमत.हि कट्टरपंथीय हिंदुत्ववाद्यांची जुनी थिअरी आहे.खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे आणि सतत तेच बोलत रहायचे.ज्याला गोबेल्सनिती म्हणले जाते.जे कालांतराने लोकांना खरे वाटू लागते.
“धर्मनिरपेक्ष” हा शब्द घटनेतून काढून टाकला पाहिजे त्याचा दुरुपयोग केला जातो अशी मल्लीनाथी राजनाथसिंह यांनी केली आहे तसे सारेच कट्टरपंथीय हिंदुत्वावादी या शब्दाला विरोध करतात.त्यांना धर्मनिरपेक्ष या संकल्पनेला विरोध करता येत नाही म्हणून शब्दाला विरोध.
ज्या अर्थी सेक्युलॅरिझमचा भारतातील अर्थ धर्मनिरपेक्ष असा नाही तर ‘पंथनिरपेक्ष’ असा आहेअसं राजनाथ सिंह म्हणाले. त्याअर्थी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी मांडणी करतो कि 
हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत-- शैववैष्णवजैनलिंगायत,बौद्धशीखवारकरी(भागवत) इत्यादी. तसेच ख्रिश्चन--येशूपंथी,मुसलमान-महंमदी पंथीपारशी-झोरॉष्ट्रीयन पंथी म्हणून असावेत अशी रा. स्व. संघाची मांडणी असते ती पुढे रेटण्याचा हा प्रयत्न तर आहेच.पंरतु हा अजेंडा राबवत असताना जो धोकादायक भाग आहे तो असा कि या सर्वांनी हिंदू धर्माचा पंथ म्हणून रहावे या देशात एकमेव धर्म असेल तो म्हणजे विराट हिंदू.बाकीच्या धर्मांनी त्याच्या अधिपत्याखाली रहावे.आणि ज्यांना मान्य नसेल त्यांनी देश सोडावा.

एकीकडे म्हणायचे कि हा देश इथली संस्कृती धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आहे आणि पुन्हा त्याच  शब्दाला विरोध करत रहायचे.बरे हा शब्द घटनेतून काढून टाकल्याने आपला देश आणि संस्कृती धर्मनिरपेक्ष राहणार नाही काय? जर त्यात बदलच होणार नाही तर मग या शब्दाला इतका आक्षेप का? कारण काही लोक म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि इतर पुरोगामी संघटना या “मुस्लिमांचे लांगूलचालन करतात हा मुख्य मुद्दा यात विरोधासाठी पुढे केला जातो.
वस्तुस्थिती मात्र या उलट आहे कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम समजाला गेल्या ६० वर्षात काय दिले आणि कोणत्याप्रकारचे लांगूलचालन केले हे सच्चर कमिटीच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे.यावरून मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा मुद्दा खरा नाही हेच स्पष्ट होते.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि भारतीय राज्यघटना ही सामाजिक दस्तावेज असून त्यामध्ये मर्यादा आणि एकतेचा भाव असल्यामुळे ती बदलण्याचा विचार कुणीही करू शकत नाही. त्यातही तसे कुणी करणार असेलतर ती एक प्रकारची आत्महत्याच ठरेल.हे वाक्य ऐकणाऱ्याला आश्वासक जरूर वाटेल परंतु ते खरेच तसे आहे काय यासंबंधी काही गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत.
भाजपा सरकार सत्तेवर आले आणि पहिलाच प्रजासत्ताक दिनाच्या वेळी जाहिरात देताना केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने संविधानातील सरनाम्यामध्ये “धर्मनिरपेक्ष व समाजवादी” हे शब्द गाळले होते.तेव्हा विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप नोंदविला होता.हि नजरचूक असू शकते काय? नेमके तेच शब्द कसे काय गहाळ झाले? तेही  कोणतीही पूर्वसूचना वा घटना दुरुस्ती न होता? हि कसली हेकेखोर दडपशाही आहे? तेव्हा एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे कि नरेंद्र मोदी आम्ही असे करणार आहोत अशी कबुली कधीही देणार नाहीत.तर या गोष्टी अशा हळूहळू आडमार्गाने अमलांत आणल्या जातील.यासाठी आणखी एक उदाहरण पाहुया.
बिहारच्या निवडणुका दरम्यान सरसंघचालक मोहन भगवत यांनी आरक्षणाचा पुनर्विचार आणि समीक्षा करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी आम्ही असे काही करणार नसल्याचे सांगितले.
वस्तुस्थिती अशी आहे कि उच्चशिक्षणातील शिष्यवृत्ती या सरकारने बंद केलेली आहे.याचा अर्थ एक मार्ग यांनी अगोदरच बंद केला.तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्याचे शैक्षणिकधोरण ठरविताना दलितआदिवासी आणि विशेष गरजा असणारे विद्यार्थी (अंधअपंगमंदगतीमंद इ. शारीरिक आव्हाने असलेले) यांच्या सवलती रद्द करणारा मसुदा बनविला, आणि त्यास प्रखर विरोध झाल्यांनतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तो संपूर्ण मसुदाच रद्द करावा लागला.
त्यामुळे भाजपाच्या कोणत्याही नेत्याची वक्तव्ये/मते आणि कट्टरपंथीय व आरएसएस याची मते यांचा एकमेकांना पूरक संबंध व पाठिंबा आणि त्याबरहुकुम कृतीशील हालचाली होत आहेत हे स्पष्ट व्हावे.त्यामुळे आज पंतप्रधान जरी असे बोलत असले तरी ते त्यांच्याकडून होणारच नाही याची कुणी शास्वती देवू शकणार नाही.

मध्यंतरी सरसंघचालक मोहन भगवत यांनी एक वक्तव्य केले जे अमेरिकेत रहातात त्यांना अमेरिकन म्हणतात. चीनमधे रहातात त्यांना चिनी म्हणतात.
पाकिस्तान मधे रहातात त्यांना पाकिस्तानी म्हणतात."आपण हिंदूस्तानात राहतो म्हणून हिंदूस्तानी."
याच धर्तीवर आसामचे राज्यपाल पि.बी.आचार्य म्हणाले “हिंदुस्तान हा देश फक्त हिंदूंसाठी आहे. इथल्या मुस्लिमसमाजाला जर दुसरीकडे दुसऱ्या देशात जायचे असेल तर खुशाल जावे.”
सरसंघचालक भागवत म्हणतात ते एकवेळेस वेगळे मानता येते.कारण ते सरकारी पदावर नाहीत.
परंतु एका संविधानिक पदावरील जबाबदार व्यक्ती असे म्हणत असेल तर ते किती गंभीर आहे याचा विचार करा.याचा अर्थ या सरकारने आपल्या विचाराची माणसे कुठे कुठे आणि किती महत्वाच्या पदावर बसविलेली आहेत.ती याच अजेंड्यासाठी.म्हणून यांना सेक्युलर असणे फार अडचणीचे ठरते आहे. या राज्यपालांवर आणि इतर वाचाळवीरांवर भाजपा सरकारने आजवर काय कारवाई केली आहे?

या निमित्ताने आपण सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण हिंदूस्तानात नाही तर भारतात राहतो. भारतीय संविधानात कुठेही भारताला हिंदूस्तान अथवा नागरिकांना हिंदूस्तानी असा उल्लेख केलेला नाही.त्यामुळे भारताला हिंदुस्तान म्हणने सुद्धा बंद केले पाहिजे.
मुळात हे जे काही अजेंडे राबविणे चालू आहे ते घटनेला हळूहळू क्षतीग्रस्त करून ती खिळखिळी करणे आणि तद्नंतर धर्मधीष्ठीत समाजरचना निर्माण करून पुन्हा इथे चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू करणे हे सत्ताधारी व ब्राह्मण्यवादी घटकांची धडपड आहे.समता,न्याय,बंधुता या मुल्यधीष्ठीत असलेला आधुनिक समाज यांना नको असतो तर विषमतेवर आधारलेला सनातन समाज त्यांना पुन्हा हवा आहे.आणि यासाठी आता तमाम लोकशाहीवादी स्वातंत्र्यप्रेमी जनतेने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे आपली भारतीय राज्यघटना वाचविणे हि काळाची गरज आहे.
सावध ऐका पुढल्या हाका...!!

 - मिलिंद धुमाळे 

पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE २९/११/२०१५  

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

पंतप्रधानांचा धर्म कोणता ?

हा प्रश्न वाचला कि तुमच्याही भुवया उंचावल्या असतील तर थांबा आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो.
त्यानुसारच हा प्रश्न आहे परंतु पंतप्रधान वैयक्तिक धारण करतात त्या धर्माशी या प्रश्नाचे काही देणेघेणे नाही.
त्यांना पुन्हा एकदा त्यांचा “राजधर्म” कोणता याची आठवण करून द्याविशी वाटते.अशी परिस्थिती खुद्द त्यांनीच निर्माण केलेली आहे.मागे एकदा गुजरात दंगल घडविली गेली तेव्हाही त्यांच्याच पक्षाचे त्यावेळचे दस्तूरखुद्द पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना तेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या आणि सध्या देशातील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच “राजधर्माची” आठवण करून द्यावी लागली होती.

नरेंद्र मोदी यांचे तेव्हाचे वागणे आणि आजचे वागणे यात फरक करता येत नाही. इतके सार्धम्य आहे.
नरेंद्र मोदींनी केवळ सरकारवर स्तुतिसुमने उधळणारे सरकारचे खुशमस्करे आणि आपला लाडका भक्त परिवार यांचीच काळजी व्हायची नसून सरकारवरच्या धोरणांवर नापसंती व्यक्त करत टीका करणाऱ्या,खुश नसणाऱ्या आणि मने दुखावलेल्या सामान्य नागरिकांवरही कृपादृष्टी ठेवायला हवी.कृपादृष्टी हा शब्द प्रयोग यासाठी कि मोदी सध्या कोणत्या जगात वावरतात हे सामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. तसे साहेब देशात कमीच असतात.त्यामुळे साहेबांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष अंमळ जातच नाही.मोदी अनके भाषणात “मेरे सव्वासो करोड” देशवासी असे अभिमानाने सांगत असतात.मात्र त्यांच्या कथनी आणि करणी मध्ये अनेकदा तफावत दिसून आलेली आहे.

देशात रंगलेल्या सहिष्णुता आणि असहिष्णुता या वादात सिनेअभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेत दिल्लीत मोर्चा काढून आम्ही सरकार सोबत आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.जो कि फारच हास्यास्पद आणि देशाच्या घटनात्मक व्यवस्था व प्रशासन प्रणालीसाठी काळजी करण्यासारखा ठरला आहे.

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि अनुपम खेर हे भाजपा खासदार किरण खेर यांचे पती आहेत.
“देशात असहिष्णुता वाढलेली नसून काही राजकीयदृष्ट्या प्रेरित लोक देशाचे नाव मुद्दाम बदनाम करत आहेत.
आम्ही ते होवू देणार नाही.” असा अनुपम खेर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांचा दावा होता.
वास्तविक सत्तारूढ पक्षालाच कुणाला तरी ढाल करून सरकारची दिवसेंदिवस ढासळत जाणारी प्रतिमा सावरायला लागणे 
हे पक्षीय लोकशाही आणि घटनात्मक प्रशासनप्रणाली असणाऱ्या देशात चिंतेचे आहे.

अनुपम खेर यांनी या वादात उडी घेतली यासाठी बिलकुल आश्चर्य किंवा सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही.
अनुपम खेर हे पत्नीधर्माला जागले कि पक्ष आणि संघटन धर्माला हा इथे खरा प्रश्न आहे.कारण पत्नी किरण खेर प्रमाणे अनुपम खेर हे सुद्धा भाजपाशी संबंधित आहेत.आणि त्याहीपेक्षा ते आरएसएसशी जास्त संबंधित आहेत असे मागेही बोलले गेले आहे..२००४ साली सेन्सोर बोर्ड CBFCच्या अध्यक्ष पदावरून त्यांना याच कारणासाठी काढले गेले होते.

यामागे कारणही असेच महत्वाचे होते. Final Solution नावाची गुजरात दंगलीवरील एक डाक्युमेंट्री होती.
तीला अनुपम खेर हिरवा कंदील देत नव्हते. गुजरात दंगलीत दोन हजाराच्यावर मुस्लिम मारल्या गेले आहेत.
हि डाक्युमेंट्री अडकविण्याची अनुपम खेर आटोकाट काळजी घेत होते.असा त्यावेळी त्यांच्यावर आरोप होता.आणि अ’खेर' त्यांच्यीच तिथून उचलबांगडी करण्यात आली.तेच अनुपम खेर आज सरकारसाठी रस्त्यावर उरतले तर आश्चर्य ते काय वाटून घ्यायचे? अनुपम खेर यांचे दुसरे सहकारी गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमानच्या खटल्यातील वादग्रस्त वक्तव्य कुप्रसिद्ध होतेच.

हेच भट्टाचार्य आंदोलनाच्या दिवशी ट्विटरवर त्यांना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या एका मुलीला देशातून हाकलले पाहिजे 
असे ट्विट करताना दिसले. मधुर भांडारकर यांच्यावरील आरोप आपल्याला माहित आहेतच.तरीही यांनी त्यांचे म्हणने मांडू नये असे अजिबात नाही पण नैतिकता नावाची एक गोष्ट असते.त्याचे काय?बर आपण काय करत आहोत? तर दुषित वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक,शास्त्रज्ञ, कलाकार,  च्या विरोधात उभे रहात आहोत. असे  करणे म्हणजे स्पष्टपणे केवळ विरोधाला विरोध आहे.

दुसरे काहीनाही. आणि यातून एक वेगळाच संदेश हि मंडळी देवू पाहत आहेत.जो घातक आहे.हा एक प्रकारचा फासीवादच आहे.जे सभ्य लोक पुरस्कार परत करणाऱ्यांना विरोध करत आहेत ते खरोखरच नैतिकदृष्ट्या सभ्य आहेत काय?
अनुपम खेर यांनी ज्या लोकांना सहिष्णुता आणि देशाची बदनामी रोखण्यासाठी गोळा केले होते,ते गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे वार्तांकनासाठी आलेल्या महिला पत्रकाराला घेराव घालून अत्यंत गलीच्छ भाषेत शिवीगाळ करताना दिसले.सदर घटनेच्या चित्रफिती सोशल साईटवर व्हायरल झाल्या आहेत.

पुरस्कार परत करणार्यांना “चपला मारा” “हाकलून लावा” अशा घोषणा परिसर दणाणून सोडत होत्या.
यामुळे आंदोलनाचा अक्षरशः फज्जा तर उडालाच.परंतु अनुपम खेर यांनी सहिष्णुता दाखविण्यासाठी मोर्चा काढला होता कि
असहिष्णुता दाखविण्यासाठी हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.त्यामुळे त्यांचा हा स्टंट अत्यंत हास्यास्पद ठरला यात काही वादच नाही.

मुळात ‘सहिष्णुता’ आणि ‘असहिष्णुता’ हे अवघड शब्द सामान्य माणसांच्या पचनी पडत नाहीत.
रोजच्या व्यवहारात ते वापरात नसल्यामुळे नेमके काय चालूय हे अनेक सामान्यांना ठाऊक नाही.अनेकांनी याबाबत विचारणा केलेली आहे. “सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?”यासाठी सहिष्णुता आणि असहिष्णुता असे बोजड आणि अप्रस्तुत शब्द टाळून मूळ वातवरणास चपखल काय आहे ते शब्द योजले पाहिजेत.आणि सध्याच्या वातावरणात धर्माचा आधार घेत “बेकायदेशीर खून करणे” आणि “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच बाळगणे”म्हणजे बोलण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार नाकारणे हे शब्द चपखल आहेत.

या बिघडलेल्या दुषित वातावरणाचा निषेध सर्व प्रथम लेखक साहित्यिकांनी केला त्याचे कारण हेच आहे.
कि त्यांचा अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिवसेंदिवस आकसत चालला आहे.या ना त्याप्रकारे त्यांना धमक्या देवून लेखन करण्यापासून रोखले जात आहे.हे लेखन करत नसलेल्या सामान्य माणसाला माहित असण्याचे कारण नाही.
ज्यादिवशी वास्तव समजेल तेव्हा देशात सामान्य माणसांच्या रोषाची त्सुनामी येवू शकते.

देशात असहिष्णुतेचे वातावरण नसून असे काहीच होत नाही असा दावा सरकार आणि त्यांच्या समर्थकाकडून वारंवार केला जातो आहे.आरएसएस प्रमुख भागवतांनी दसऱ्याला हेच सांगीतले कि सगळे शांत आहे देश प्रगती करत आहे.
ज्या देशात साठ वर्षे वयावरील वृद्धास तो केवळ दलित आहे या कारणे तो मंदिरात गेला म्हणून 
रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले जाते.
जातीयवादातून दीड वर्षे आणि चार वर्षे वयाच्या लहानग्यांना 
झोपेत असताना पेट्रोल टाकून पेटवून दिले जाते.चार वर्षे वयाच्या दलित मुलाचा हात चुकून जेवणाच्या ताटाला लागला म्हणून मरेपर्यंत बेदम मारले जाते.धर्मावर टीका करतो म्हणून दलित लेखकास बोटे छाटण्याच्या
जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. 

बीफ मुद्यावर सरकारवर टीका केली म्हणून अभिनेत्रीला बलात्कार करू
नग्न धिंड काढू अशा धमक्या दिल्या जातात.बीफ खाणाऱ्याचे मुंडके छाटू पाकिस्तानला पाठवू अशी धमकी दिली जाते.
शिक्षणाचे भगवेकरण केले जावे हे उघड बोलल्या जातेय.उच्च शिक्षणातील स्कॉलरशिप या अगोदरच बंद केली गेलीय.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव कृत्रीमरीत्या वाढवून सरकारच त्या कमी भावात विकत आहे.

या सर्व घटनांच्या विरोधात बोलले तर अशा लोकांना पाकिस्तानी एजेंट म्हणायचे.
पाकिस्तानात चालते व्हा म्हणायचे.
हे भारताचे तालिबानीकरण नाहीतर काय आहे.

समाजसुधारकांच्या हत्या आणि या अगोदर झालेल्या दलित ह्त्यांबद्दल.तर काहीच म्हणने नाही 
कारण ते फार जुने झाले आत हे जे आहे ते मागील महिन्यातील आहे.हि सर्व सहिष्णुतेची लक्षणे आहेत काय?
याची उत्तरे सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी द्यायला हवीत.ज्यांना सहिष्णुता काय असते हेच माहित नाही.
ते असहिष्णुता कुठे आहे..कुठे आहे असे विचारत आहेत.या सर्व घटना काय सांगत आहेत?
ज्यांचा कुणी मारला गेलेला नाहीज्यांना कधी धमक्या मिळालेल्या नाहीत.

ज्यांच्या देशभक्तीवर संशय घेतला जात नाही.आपले मरण कुठून येईल याची ज्यांना भीती नसते. 
अशा टिनपाट लोकांना काय कळणार आहे असहिष्णुता कशाशी खातात ते.
आता या सरकार पुरस्कृत दडपशाहीच्या विरोधात निवृत्त सैनिकांनी उडी घेतली आहे.अतुलनीय शौर्य आणि साह्सासाठी त्यांना मिळालेली पदके ते सरकारला परत करणार आहेत.भारतीय इतिहासात पदक मान चिन्ह पुरस्कार सरकारचा निषेध व्यक्त करत परत करण्याचे हे कृत्य दुर्मिळ आणि पहिलेच असावे.देशासाठी सर्वोच्च योगदान दिलेल्या या सैनिकांच्या भूमिकेवरही आत  संशय घेतला जाईल काय?

लोकांनी या अगोदरचे सरकार साठ वर्षे कसेबसे सहन केले आणि कंटाळून यांना सत्ता दिली तर या सरकारने लोकांचा अवघ्या वर्षभरात भ्रमनिरस केला.आणि लोकांना कंटाळण्यास भाग पाडले.सत्ताधारी पक्षात असूनही सत्ताधारी नेते शीर कापण्याच्या धमक्या उघड देतात आणि देशाचे पंतप्रधान त्याबद्दल ब्र देखील काढत नाहीत.गंमत म्हणजे पंतप्रधान पुरस्कार परत करणार्यांना भेटायचे सौजन्य दाखवत नाहीत,

मात्र पुरस्कार परत करणार्यांच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या अनुपम खेर आणि
त्यांच्या चौकडीला तत्पर वेळ दिला जातो.हा संदेश जाणे अत्यंत वाईट आहे याचे भान पंतप्रधानाना आहे कि नाही?
पंतप्रधान टीका ऐकण्यास घाबरतात काय? कि त्यांचे कान एवढे सक्षम नाहीत?
याचा अर्थ नरेंद्र मोदींनी केवळ सरकारवर स्तुतिसुमने उधळणारे सरकारचे खुशमस्करे आणि आपला लाडका भक्त परिवार यांचीच काळजी जास्त आहे असे स्पष्ट दिसत आहे.

असे वागणे त्या पदासाठी नक्कीच भूषणावह नाही.
पंतप्रधानांचा नेमका धर्म कोणता आहे ? हे आता त्यांनीच आपल्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे.

- मिलिंद धुमाळे 

पूर्वप्रकाशित दैनिक मी मराठी LIVE 

Translate