गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

पुरोगामी VS प्रतिगामी आणि मुस्लीम समाजाची मानसिकता

पुरोगाम्यांवर प्रतिगामी वर्तुळातून नेहमीची होणारी टीका म्हणजे पुरोगामी केवळ हिंदू धर्मावर टीका करतात,मुस्लिम धर्मावर टीका करत नाहीत.हे खरे नसते हे सर्वांना माहित आहे अगदी असे मत मांडणाऱ्यांना देखील.त्यामुळे आता बोला.आता बोला.असा धोशा प्रतिगामी वर्तुळातून लावला जातो आहे.तोपर्यंत यावर पुरोगामी वर्तुळातून टीकेची झोड उठली देखील होती.
आपण इतरांच्या चुकाच दाखविण्यात आघाडीवर असतो त्यामुळे हे लक्षात कोण घेतो?
लोकमत वृत्तपत्राच्या मंथन पुरवणीत इसीसचा पैसा आणि त्या संबधित लेखात वादग्रस्त पिगी बँक कार्टुनचा उपयोग ग्राफीक्स डिझायनरने केला. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असे म्हणत मुस्लिम धर्मियांनी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करत निषेध व्यक्त केला. या हिंसक निषेध करणाऱ्या जमावाचा कडक शब्दांत निषेध पुरोगाम्यांनी केलेला आहे.हे कृत्य बिलकुल पटलेले नाहीभावना दुखावल्या ठीक आहे.कशासाठी?त्यावर ‘अल्लाह रसूल मोहम्मद’ नाव होते म्हणून.ती भावना खरी असेल तर निषेधाचा संविधानिक मार्ग आहे.कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा कोणत्या निषेधाचा मार्ग आहेअसा कायदा हातात घेणे योग्य आहे काय लोकमतनेही तातडीने माफी मागत सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो ही संशयास्पद आहे.त्यातही आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे वाईट आहे.तुम्हाला जर पूर्वकल्पना होती तर असा प्रकार करायची गरज नव्हती.अन्यथा आपल्या कृत्यावर शेवटपर्यंत ठाम रहायला हवे होते.
मुळात एक गोष्ट मुस्लिम समुदायाने लक्षात घ्यायला हवी देशातील वातावरण खराब आहे याप्रसंगी आपण सर्वांनी फार गांभिर्याने वागले-बोलले पाहिजे.असहिष्णुतेचे वातावरण असताना राष्ट्रगीताला उभे राहण्यास नकार देणे हे आगीत तेल ओतण्यासारखे आहे.ज्यांना शारीरिकदृष्ट्या जमणारे नव्हते त्यांना सोडून इतरांनी तरी उभे राहणे हे त्याप्रसंगी गरजेचे होते.अर्थात त्यांना तेव्हा राष्ट्रगीत चालू असताना आग्रह करणारे.त्याचा व्हिडिओ बनविणारे हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत.त्यांना बाहेर हुसकावून लावणाऱ्यांचा देखील निषेध केला पाहिजे.राष्ट्रगीताला उभे रहावे असा कायदा नाही.तर ती नैतिकता आहे.ती पाळणे हा सभ्यपणा आहे ती पाळायची कि नाही हा आपला प्रश्न.मात्र अशा वातावरणात उगाच आणखी पेच निर्माण करून वातावरण खराब करणे टाळले पाहिजे.
इस्लामिक स्टेटचा क्रूर दहशतवाद जगप्रसिद्ध असताना आपण त्या संबंधातील बातमीसाठी असे पाऊल उलणे हे आपल्याला अडचणीत आणनारे ठरेल असे वाटले नाही कायअनेक वृत्तपत्रांनी इस्लामिक स्टेटच्या समर्थनार्थ मुस्लिम रस्त्यावर’ असे बातमीचे वार्तांकन केले आहे.याचे भान किती मुस्लिमांना आहेया आंदोलनाने भारतीय समाजात चुकीचा मॅसेज गेला.पिगी बँक म्हणजे पैसे साठविण्याच्या उपयोगी येणारे साहित्य आहे.ते जगभरात उपलब्ध आहे.त्याचे काय करायचे?आजच्या आधुनिक युगात त्यावर नाव आल्याने भावना भडकण्याची खरेतर गरज होती असे मला वाटत नाही.आपल्या धार्मिक भावना इतक्या ठिसूळ कावर्तमान पत्र आणि त्यातील चित्राचा जीव काही तासांपुरता असतो संध्याकाळ झाली कि वर्तमानपत्र रद्दी होते.त्याचे आयुष्य,अस्तित्व संपून जाते.ते दुर्लक्षित केले असते तर कुणाला काहीच कळले नसते.आपला धर्म आणि धार्मिक प्रतीके इतकी टोकदार का आहेत?
दुसरे म्हणजे इस्लामिक स्टेटच्या झेंड्यावर तीच नावे आहेत.कुणाची अमानुषपणे कत्तल करण्याआधी ते जोरजोरात अल्लाह हु अकबर” म्हणत असतात.
याचा आपण कधी रस्त्यावर उतरून निषेध केलाय कामी आजवर पाहिलेले नाही.
इस्लामिक स्टेट आणि इस्लामचा संबंध आहे कि नाहीभारतीय मुस्लिमांची त्याबाबत अधिकृत आणि सर्वमान्य भूमिका काय आहेआपली मुले तिकडे आकर्षित का होतातआणि मला अनेकदा पडलेला प्रश्न जगभरातील मुस्लिम समाजाचे भारतीय मुस्लिम समाजाला काय पडले आहे? काय संबंध आहे तुमचाजगातील इतर मुस्लिम देशात कुणावर अन्याय अत्याचार झाला तर त्याचा निषेध भारतात काहे आता कळेनासे झाले आहे. यात मानवतावादी दृष्टीकोन मानायचा तर नुकत्याच पेरीसवर झालेल्या हल्ल्यासाठी कुठेही मानवतावादी दृष्टीकोन पहायला मिळाला नाही. रझा अकादमीने केलेल्या उन्मादाचा बट्टा ठळकपणे उमटलेला आहे.सिरीयात तिकडच्या मुस्लिमांना त्रास त्यासाठी तुम्ही इस्लामिक स्टेटच्या युद्धात सहभागी व्हायला जाणार आहात?
तुमची ओळख भारतीय म्हणून आहे कि जागतिक मुस्लिम म्हणून आहेउद्या त्याचे लोण इथे आले तर काय करायचेयाची किमंत सर्वांनाच आणि पर्यायाने देशाला फार मोठी चुकवावी लागेल.यातून जे प्रश्न विचारले गेले आहेत ते शिकलेल्या पुरोगामी आणि प्रगल्भ मुस्लिम मित्रांना त्यांनी यावर गंभीरपणे चर्चा करायला हवी.निर्णय घ्यायला हवा.जसे सर्वच हिंदू वाईट नसतात तसे सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.कट्टरपंथीय आणि पुरोगामी यात फरक केलाच पाहिजे.
आज समाजाला धर्माची गरज नाही तर चांगले शिक्षण आरोग्य आणि जगण्यासाठी नोकरी व्यवसाय या मुलभूत हक्क अधिकारांची गरज आहे. त्यासाठी लढले पाहिजे.
धर्म-जात या खुळचट संकल्पनाच हळूहळू बाद करत गेले पाहिजे. अर्थात सगळेच धर्म.
वेगळे धर्म वेगळे पंथ वेगळी ओळख हे सर्व कुठवर जोपासायचेसर्वाचा एकच धर्म एकच पंथ "भारतीय" म्हणून आपण विकसित नाही का करू शकतनिदान भारतापुरते तरी?
इस्लामिक स्टेटबद्दल भारतीय मुस्लिमांचे वाढणारे आकर्षण चिंताजनक आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate