भाजपला धक्का.भाजपचे बुरे दिन सुरु झाले.विरोधी पक्षानी EVM वर मतदान न घेता बलेतपेपरवर घ्यायची मागणी लावून धरली तर लवकरच हा पक्ष संघापुरता मर्यादित होईल.आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए युतीतून बाहेर पडत सर्वांना राजीनामा देण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबतचे आश्वासन न पाळल्यामुळे तसेच नरेंद्र मोदींनी फोनही उचलला नसल्यामुळे अपमानास्पद वागणुकीचा निषेध करत चंद्राबाबू नायडू यांनी तडकाफडकी युतीतून बाहेर पडणे पसंत केले.
महाराष्ट्रात एक असाच निर्लज्ज पक्ष आहे.त्यांना कितीही लाज काढली तरी बिन लाजे सत्तेतच लाळघोटत राहताना दिसतात.नरेंद्र मोदी खूप काम करतात अशी टिमकी नेहमीच वाजवली जाते.ते एक दिवसही सुट्टी घेत नाहीत असंही भक्तांकडून सांगितलं जातं.
मुळात ज्यांना पत्नी नाही.मुलं नाहीत.संसार नाही अन रोज आलिशान जीवन व्यतीत करायला मिळत असेल दररोज विदेश दौऱ्याची मजा घ्यायला मिळत असेल तर कोणता मूर्ख सुट्टी घेईल अन कशाला घेईल? याजागी तुम्ही आम्ही असतो तर आपणही सुट्टी घेतली नसती.
परंतु यांचे दावे किती फालतू उथळ आणि खोटे असतात हे वारंवार सिद्ध होत आले आहे.
मुलांसोबत टाईमपास करणे त्यांना नापास करण्यासाठी फालतू चुकीची पुस्तके लिहून गंडवणे ज्या अर्थी आपल्याला तीनचा पाढा येत नाही.अशा व्यक्तीला उगाचच मोठे करून लोकांच्या माथी मारण्याचे कारस्थान विशिष्ट जमातीने केलेले आहे.
हे तेच लोक आहेत जे समाजात बुवा भगत गुरु साध्वी साधू इत्यादीच्या माध्यमातून समाजातील भोळ्या लोकांना मूर्ख बनवून आपला फायदा करून घेत असतात.हजारो कोटींचे घोटाळे करून विदेशात पळून जात असतात.अशा लोकांनी यावेळी हा लाखोंचे सूटबूट घालणारा गारुडी लोकांच्या माथी मारला.
ज्याला आपल्या सोबत युतीत असणाऱ्या सरकारमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं एका राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचा फोन देखील घेता येत नसेल तर असा व्यक्ती प्रधानमंत्री पदावर बसण्याच्या लायकीचा आहे काय? जे युतीतील पक्षांनाही चुना लावतात आश्वासने पाळत नाहीत.ते सामान्य जनतेचे काय भले करणार?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा