गुढीपाडवा साजरा करण्याच्या विरोधी कल्टमध्ये आंबेडकरी समाजाने सहभाग घेऊ नये
या संर्दभातील लेखाचा उत्तरार्ध -
गुढीपाडवा साजरा का करू नये याचे संदर्भ दावे वगैरे जे सोशल मिडिया
आणि इतर ठिकाणी प्रचलित आहेत.
मी ते अॅज इटीज दिले.जे बाहेर प्रचारित आणि प्रसारित होतेय,ज्यावर एक पुस्तकही छापलेलं आहे तेच मुद्दे इथं मांडले कारण मग मूळ मुद्दा समजायला सोपं जातं.अनेकांना ते समजलेही.विशेषतः ज्यांच्यासाठी लिहिलं त्यांना.
आणि इतर ठिकाणी प्रचलित आहेत.
मी ते अॅज इटीज दिले.जे बाहेर प्रचारित आणि प्रसारित होतेय,ज्यावर एक पुस्तकही छापलेलं आहे तेच मुद्दे इथं मांडले कारण मग मूळ मुद्दा समजायला सोपं जातं.अनेकांना ते समजलेही.विशेषतः ज्यांच्यासाठी लिहिलं त्यांना.
यात कुणा समाज व्यक्तीला बदनाम करण्याचा टीका करण्याचा छुपा अंत्यस्थ हेतू नव्हता तसा तो कधी नसतो.म्हणजे जे म्हणायचं आहे ते उघड म्हणन्यास काही प्रत्यवाय नाही.त्यादिवशी अशाच प्रकारचे संदेश मला व्हाटसेपवर प्राप्त झालेले आहेत तेही आंबेडकरी मित्रांकडून.ज्यांना इच्छा आहे त्यांनी इनबॉक्समध्ये तशी विनंती करावी पुरावे दिले जातील.यात माझ्या मनाचं कपोलकल्पित वगैरे काही नाही.हे संदर्भ दावे वगैरे माझं संशोधन नाही.
असे संदेश उघड प्रसारित होतात ते लक्षात घ्यायचं नसेल किंवा डोळे झाक करत केवळ मिलिंद धुमाळे ने मांडलं म्हणून थयथयाट करायचा असेल त्यांनी तो जरूर करावा.मात्र जे माझे दावे नाहीत संशोधन मांडणी माझी नाही त्याबद्दल मला दोषी धरून ऊर बडवणाऱ्यानी वस्तुस्थिती एकदा तरी जाणून घेतली पाहिजे.
मला कीव येते त्यांच्या बालिशबुद्धीची.माझ्या पोस्टवरून काहींनी थयथयाट सुरु केला आहे. पुरोगामी व्यक्तींची चळवळ त्यांचं माध्यम बदनाम करण्याचा हा एक बालिश प्रयत्न आहे तो अक्षरनामा आणि बिगुल या पोर्टलचा जाणीवपूर्वक नामोल्लेख झाल्यामुळे लक्षात आलं.अर्थात तो विशिष्ट लोकांकडूनच सुरु आहे हे वेगळं सांगायला नको.त्यांचे अजेंडे असतात त्याप्रमाणे ते वागत असतात.अर्थात माझाही त्या पोस्टमागे काहीएक अजेंडा आहे होताच. तो अत्यंत स्पष्ट होता.
माझ्या समाजाने कोणत्याही परीस्थितीत तोफेच्या तोंडी उभं राहून नुकसान करून घेऊ नये.मुद्दा फक्त हिंदू धर्मातील सणांचा नाही.गांधीवरील टीकेचाही आहे.
हे मागेही एकदा मी मांडलं आहे.
ज्यांनी खून केला ते राष्ट्रभक्त राष्ट्रवादी म्हणून मिरवतात आणि आम्ही मात्र गांधीवर टीका करून देशद्रोही ठरवले जातो.आज समाजाला महत्वाचं काय हे पाहणं जास्त गरजेचे आहे.जे घडून गेलेय त्यानिरुपयोगी मुद्यांवर टीका करून ते आज बदलणार नाही.आणि फायदाही होणार नाही.
हे मागेही एकदा मी मांडलं आहे.
ज्यांनी खून केला ते राष्ट्रभक्त राष्ट्रवादी म्हणून मिरवतात आणि आम्ही मात्र गांधीवर टीका करून देशद्रोही ठरवले जातो.आज समाजाला महत्वाचं काय हे पाहणं जास्त गरजेचे आहे.जे घडून गेलेय त्यानिरुपयोगी मुद्यांवर टीका करून ते आज बदलणार नाही.आणि फायदाही होणार नाही.
आपलं विशिष्ट डबकं म्हणजे जग नाही.त्या डबक्याबाहेर प्रचंड मोठं आणि समजुतीने वागणारं समजून घेणारं आणि आपल्या चुका मोठे मन करून स्वीकारत पुढे चालणारं एक जग आहे हे विशिष्ट डबक्यात हुंदडणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं.तुम्ही नागडे आहात याची जाणीव करून दिली म्हणून थयथयाट करण्यापेक्षा कपडे घालावे आपत्कालीन परिस्थिती टॉवेल गुंडाळून घेतला तरी चालेल पण नाही आमचा नग्नपणाही पारदर्शक आहे हे जगाला दाखवून द्यायचं असतं यांना.त्यामुळे यांना कार्पेटमध्ये गुंडाळलं तरी नग्नता झाकली जात नाही.हिंदू धर्म हा विषमतावादी धर्म आहे यात नविन काय आहे? मुद्दा हा नव्हताच सणांचा होता.आणि आम्ही तर टीका करू नका हेच सांगतोय.
त्यात एक सांगायचं राहिलं ज्या सण उत्सवांचा त्रास होतो त्यावर तर बोललेच पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळली पाहिजे अशा सणांचा इतरांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी त्या त्या धर्मांनी घेतली पाहिजे.
त्यात एक सांगायचं राहिलं ज्या सण उत्सवांचा त्रास होतो त्यावर तर बोललेच पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळली पाहिजे अशा सणांचा इतरांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी त्या त्या धर्मांनी घेतली पाहिजे.
मी तर उघड माझ्याच आंबेडकरीसमाजावर टीका केली दुषणे दिली तरीही त्यांनाच त्रास झाला ये बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना क्यू? माहितेय कारण तूम्ही सुधारू नये असं त्यांचं मत असतं कायम नको त्या प्रश्नावर मुद्यांवर संघर्षरत करणे बिझी राहणे हेच त्यांचे ध्येय असते जेणेकरून तुम्ही प्रगती करू नये.म्हणून आरक्षण बंद करण्याची धमकी दिली जाते दम असेल तर करून बघा म्हणावं.
मला व्यक्तिशः १९५६ अगोदरच्या कोणत्याही प्रकारच्या इतिहासात रस नाही.
फारतर १९४७ नंतरचा इतिहास स्वीकारायला हरकत नाही.अर्थात तोही स्वातंत्र्यलढा या अनुषंगाने.
आंबेडकरी-बौद्ध समाजासमोर सण-उत्सव यात रममाण होण्यापेक्षा आणि इतर सणांना विरोध करण्यापेक्षा जास्त कळीचे आणि मुलभूत प्रश्न आहेत,सर्वात प्रथम भयमुक्त जगण्याचा नैसर्गिक हक्क अधिकार,संरक्षण,शिक्षण,रोजगार या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे.ही त्या पोस्टची मुख्य भूमिका होती.असो.
फारतर १९४७ नंतरचा इतिहास स्वीकारायला हरकत नाही.अर्थात तोही स्वातंत्र्यलढा या अनुषंगाने.
आंबेडकरी-बौद्ध समाजासमोर सण-उत्सव यात रममाण होण्यापेक्षा आणि इतर सणांना विरोध करण्यापेक्षा जास्त कळीचे आणि मुलभूत प्रश्न आहेत,सर्वात प्रथम भयमुक्त जगण्याचा नैसर्गिक हक्क अधिकार,संरक्षण,शिक्षण,रोजगार या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे.ही त्या पोस्टची मुख्य भूमिका होती.असो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा