गुढीपाडवा हा उपद्रवमूल्य नसलेला सण आहे.
ना लाऊडस्पिकर ना ढोलताशे,ज्यांना साजरा करावासा वाटतो ते घरात गोडधोड करतात दारात बांबू रोवून गुढी उभारतात.
ना लाऊडस्पिकर ना ढोलताशे,ज्यांना साजरा करावासा वाटतो ते घरात गोडधोड करतात दारात बांबू रोवून गुढी उभारतात.
मात्र अलिकडे काही ठिकाणी शोभायात्रा काढण्याचे आणि त्यात ढोलताशा वाजविण्याचे प्रकार वाढले आहेत.
स्त्रिया-मुली नऊवारी आणि वर भगवा फेटा बांधून थोर प्रथा संस्कृती की काय ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जपायचा प्रयत्न करताना दिसतात.
नटायला मुरडायला मिरवून घ्यायला मिळणे ही नैसर्गिक आवड आहे.यानिमित्ताने ती हौस भागवली जाते म्हणून तरुणाई यात आघाडीवर आहे.यामागे एवढाच विचार आहे.हे लक्षात घेतलं पाहिजे.
नटायला मुरडायला मिरवून घ्यायला मिळणे ही नैसर्गिक आवड आहे.यानिमित्ताने ती हौस भागवली जाते म्हणून तरुणाई यात आघाडीवर आहे.यामागे एवढाच विचार आहे.हे लक्षात घेतलं पाहिजे.
गुढीपाडवा साजरा करण्यामागचे कारण-
या दिवशी संभाजी महाराजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली,
आणि त्यांचं धड वेगळं करून मुंडके भाल्यावर की उंच बांबूवर रोवून मिरवणूक काढल्या गेली.शेवटपर्यंत हा आपला स्वाभिमानी राजा बधला नाही.म्हणून त्यांच्या शरिराचे अक्षरश: तुकडे केले गेले होते.असे सांगितले जाते.संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनांचा इतिहास या पुस्तकात पान क्र.24 वर ही माहिती दिली आहे इतर काही मराठा संघटनाही ही माहिती देत असतात,पाडवा साजरा करू नये यासाठी यामागील हे कारण सांगितलं जातं.
या दिवशी संभाजी महाराजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली,
आणि त्यांचं धड वेगळं करून मुंडके भाल्यावर की उंच बांबूवर रोवून मिरवणूक काढल्या गेली.शेवटपर्यंत हा आपला स्वाभिमानी राजा बधला नाही.म्हणून त्यांच्या शरिराचे अक्षरश: तुकडे केले गेले होते.असे सांगितले जाते.संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनांचा इतिहास या पुस्तकात पान क्र.24 वर ही माहिती दिली आहे इतर काही मराठा संघटनाही ही माहिती देत असतात,पाडवा साजरा करू नये यासाठी यामागील हे कारण सांगितलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे संधीसाधू पक्ष संघटना आणि इतर काही लोकांना हे मिथ वाटतं.त्यामुळे मराठा समाजातच यात मतभेद आहेत.ब्राह्मणांनी गुढी उभारली की नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होत नसले आणि कुणी मान्य करत नसले तरी संभाजी राजांची अशी धिंड काढून त्यांचे शिर फिरवले गेले होते हे सत्य आहे.अशी पुष्टी सेतू माधवराव पगडी यांनी देखील केली आहे.त्याच्याशी कुणाला देणेघेणे नाही.नसते.कारण शेवटी सगळे राजकारण हे ब्राह्मणीसंस्कृती केंद्रित.यात विशेष बाब म्हणजे अब्राह्मणी म्हणजे बहुजन जाती सर्वात पुढे आघाडीवर असतात.
यात आणखी एक गोष्ट अशी की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांच्या विखूरलेल्या शरीरअवयवांना गोळा करून ते शिवून त्यावर विधिवत अंत्यसंस्कार हे वढू येथील गोविंद महार नामक पहिलवानाने केले ही बाब सांगायला सर्वांना लाज वाटते कारण एका महाराच्या हातून राजांचा अंत्यविधी झाला हे लाजिरवाणे वाटत असावे म्हणून वढू येथील समाधी जवळ तसा उल्लेख असलेला बोर्डही हिंदुत्ववादी संघटनांनी काढून इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आणि भलत्याचेच नाव त्यात लावले गेले.
इतिहास फक्त विशिष्ट समाजाच आपल्या सोयीने लिहितो अशातला भाग नाही सगळेच आपापल्या सोयीचा लिहितात.
दुसरा मुद्दा गुढीपाडवा रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून त्यादिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितलं जातं मात्र रामायण हेच एक मिथ आहे,काल्पनिक काव्य आहे त्यामुळे या संदर्भालाही तसा अर्थ उरत नाही.शिवाय जिथे जिथे रामायण घडलं असं संगितलं जातं त्या भागात गुढी उभारण्याची प्रथाच नाहीये.
तिसरा मुद्दा – इथून हिंदूंचे नविन वर्ष सुरु होते.आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.निसर्ग चक्र पाहता मला हे नविन वर्षे वाटत नाही.
म्हणजे उलट हे वर्ष संपतेय.पानगळ होतेय झाडे झडतायत झरे नदी नाले आटत आहेत उन्हाळा सर्वात भयंकर दमवणारा ऋतू आहे.भारतीय समाजहा ऋतूंच्या कालचक्रावर जास्त अवलंबून आहे.त्यामुळे हा ऋतू नववर्षाच्या आगमनासाठी अनुकूल वाटत नाही.याउलट पाऊस सुरु होतो.
म्हणजे उलट हे वर्ष संपतेय.पानगळ होतेय झाडे झडतायत झरे नदी नाले आटत आहेत उन्हाळा सर्वात भयंकर दमवणारा ऋतू आहे.भारतीय समाजहा ऋतूंच्या कालचक्रावर जास्त अवलंबून आहे.त्यामुळे हा ऋतू नववर्षाच्या आगमनासाठी अनुकूल वाटत नाही.याउलट पाऊस सुरु होतो.
तो सुरुवातीचा दिवसच नवीन वर्षे म्हणून साजरा केला गेला असता तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं.पाऊस सुरु झाला की धरणी नवीन साज चढवते.सगळं साचलेलं धुवून स्वच्छ होऊन जातं.नवीन पालवी फुटते.झाडे बहरू लागतात.पाण्याचं मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.
नवीन वर्षासाठी याचा विचार का केला गेला नाही? कळत नाही.असो.
नवीन वर्षासाठी याचा विचार का केला गेला नाही? कळत नाही.असो.
आता वरिल कारणे सोडा,हे काहीही असले तरी हिंदू लोक हा सण साजरा करतात,यात आंबेडकरी समाजाने विरोधरुपी करणीचामोगा कशाला बनायला पाहिजे? कुणाच्या गुढीखाली किती अंधार हाय हे समद्या गावाला ठावं हाय..बरोबर ना?
परंतु, आम्ही बौद्ध आहोत आम्हाला अमूकढमूक सणाच्या शुभेच्छा देऊ नका असे फेसबुकवर पूर्वी कुणा छपरीने पसरवलं होतं.आज त्याचीच ही पुनरावृत्ती पहावयास मिळते,कुणी ना कुणी याची री ओढताना दिसतो.
उद्या असेच कुणा हिंदूने आम्ही हिंदू आहोत आम्हाला आंबेडकर जयंती बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देऊ नका म्हणून पोस्टीं टाकल्या तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? अंगाला मसाला चोळून सोशलमीडिया डोक्यावर घ्याल ना?
अशा अक्कलशुन्य लोकांमुळे ध्रुवीकरणाला हातभार लागतोय.
अशा अक्कलशुन्य लोकांमुळे ध्रुवीकरणाला हातभार लागतोय.
आंबेडकरी समाज वेगाने आयसोलेशनकडे ढकलला जातोय.मित्रता वाढायची सोडून आणखी शत्रू निर्माण होत आहेत.आपण हिंदूंचे सण साजरे करत नाही ठीक आहे.आपण 22 प्रतिज्ञा पाळतो मानतो तेही ठीक आहे.ती अपेक्षा पुरातन देवभोळ्या अंधश्रद्ध हिंदू समाजाकडून कशीकाय आणि कशासाठी?
हिंदू समाजाला सुधरवायचा ठेका आंबेडकरी बौद्धांनी घेतलाय काय?
हिंदू समाजाला सुधरवायचा ठेका आंबेडकरी बौद्धांनी घेतलाय काय?
पारशी जैन शीख लिंगायत मुस्लिम ख्रिस्ती हे समाज या देशात आहेत की नाही?
की फक्त कट्टरहिंदू आणि आंबेडकरी बौद्ध समाज आहे? आणि आम्ही बौद्ध झालो म्हणजे आम्हीच सर्वात ग्रेट आम्हीच बुद्धिमान हुशार बाकी सगळे मूर्ख या गंडातून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? बुद्धाने प्रेम करायला शिकवलं मंगलमैत्रीचा संदेश दिलाय.आपण नक्की कुठे चाललोय? यावर कधीतरी विचार करा.
की फक्त कट्टरहिंदू आणि आंबेडकरी बौद्ध समाज आहे? आणि आम्ही बौद्ध झालो म्हणजे आम्हीच सर्वात ग्रेट आम्हीच बुद्धिमान हुशार बाकी सगळे मूर्ख या गंडातून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? बुद्धाने प्रेम करायला शिकवलं मंगलमैत्रीचा संदेश दिलाय.आपण नक्की कुठे चाललोय? यावर कधीतरी विचार करा.
ऐकीकडे देशाची वेगाने हिंदू राष्ट्राकडे घोडदौड सुरु आहे आणि आपण आपल्या शेजारी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी त्रास न होणाऱ्या सणांवर देखील टीका करून विरोध करून त्यांना आणखी कट्टर बनवत चाललो आहोत.आज मराठा समाजातील बहुतांश व्यक्तीना संभाजी राजांची हत्या झाल्याचे मान्य नाही हा सण आणि संभाजी राजांची हत्या या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे अनेकांचे मत आहे.शिवाय यात ब्राह्मण पुरोहित वगैरे यांचा हस्तक्षेप नाही.
हा वैयक्तिक,कौटुंबिक पातळीवर साजरा केला जाणारा सण आहे त्यामुळे तो साजरा केला तर कुणाच्या झोळीत दगड येणार आहे?अशी मानसिकता सण साजरा करणाऱ्या व्यक्तीची असेल तर ती चुकीची ठरत नाही.जे सण आपण साजरेच करत नाही ते इतरांनीही साजरे करू नये हा अट्टाहास सोडला पाहिजे.
आपल्याला वैयक्तिक सांघिक पातळीवर ज्याच्या त्रास होत नाही.त्या सण प्रथा काहीही असो त्याविषयी बोलून विरोध करून ते आणखी रुजवणे बंद केले पाहिजे.याउलट भायाचारा कसा वाढेल हे पाहणे जास्त गरजेचे आहे.येणारा काळ आंबेडकरी बौद्ध आणि समविचारी पुरोगामी नास्तिक लोकांसाठी कठीण असणार आहे.ते लक्षात ठेवून पाउले उचलणे गरजेचे आहे.
विरोध कशाला करायचा कुठे करायचा त्यातून निष्पन्न काय होणार आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा