भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. हिंदू संघटनांनी हा हल्ला केला होता, असा सत्यशोधन अहवाल समन्वय समितीनं दिलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी ही समिती नेमली होती.
त्या ठिकाणी हजर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं. पोलिसांना ऑडिओ ,व्हिडीओ,फोटोजचे पुरावे देणार. संभाजी भिडे ,मिलिंद एकबोटे हे आरोपी असून त्यांना अटक करावी यासंदर्भातले पुरावेही पोलिसांना देणार, असं या अहवालात म्हटलं आहे.
तसंच मिलिंद एकबोटे यांनी किमया हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची तीस डिसेंबरलाच बैठक घेतल्याचे पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याचं म्हटलंय.
सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले.- दैनिक लोकमत First Published: Jan 20, 2018 04:35 PM
संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे या दोघांना ताबडतोब अटक केली पाहिजे त्यांना आता सुट्टी देवू नये.
मुख्यमंत्री जर मुख्यमंत्री म्हणून काम न करता दहशतवादी ब्राह्मण बांधवाना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर हे समस्त ब्राह्मणसमाजासाठी घातक आणि लाजिरवाणे ठरणार आहे.
मुख्यमंत्री जर मुख्यमंत्री म्हणून काम न करता दहशतवादी ब्राह्मण बांधवाना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर हे समस्त ब्राह्मणसमाजासाठी घातक आणि लाजिरवाणे ठरणार आहे.
बहुजन समाजात फुट पाडणारे मराठा-बौद्ध भांडण लावून विकृत इतिहास रचून तरुणांची माथी भडकावून आपली पोळी शेकणारे या सर्वांच्या मागे हा मनुवादी ब्राह्मणी मेंदू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
सदर समाजकंटक ब्राह्मण आहेत म्हणून आजवर मुख्यमंत्री आणि स्वत:च गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पाठीशी घातले अभय देत आले असे तर नाही ना? त्यांनी जातीसाठी माती खाऊ नये.
काय आहे आम्ही अन्याय अत्याचार भोगतच आलो आहोत परंतु तुमच्या वागण्यातून तुम्हीच तुमची जात आणखीन अन आणखीनच बदनाम करत आहात.याठिकाणी स्वत: ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी समाजसेवकांनी अशा समाजकंटक लोकांना थारा न देता पकडून दिले पाहिजे.आणि समाजाची होणारी संभावित बदनामी थांबवली पाहिजे.
नाहीतर येणाऱ्या पिढ्याना हाच संदेश जाईल की भारतात जातीय कलह कळी करण्यात तुमचाच हात कायम रंगत आलेला आहे.
जी गोष्ट मागील दोनशे वर्षात कधीच घडली नाही.कधी कुणाचा राग नाही.कधी साधी बाचाबाची नाही.उलट प्रत्येकवर्षी सामाजिक सलोख्यातून तिथे इतर सोयी-सुविधा सर्वच बहुजनसमाजातील घटकांनी पुरवल्या पुरवत आले आहेत.आणि रोजगारव्यवसाय देखिल निर्माण झालेला आहे.
अशा शांततेच्या वातवरणाला या विकृत मानसिकतेच्या लोकांनी गालबोट लावून सामाजिक एकतेचाच खून पाडला आहे.यात त्यांना काही जातीयवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी देखील साथ दिली.अन अशा विकृत लोकांनी फेसबुकवर पोस्टी लिहून त्यांच्यासाठी बचावात्मक पवित्रा देखील घेतला.तसेच सामना या जातीयवादी पेपरमधून भलतेच बालिश तर्क मांडणारे संजय राऊत या सर्वाना वरील अहवाल थोबाड फोडणारी सणसणीत चपराक आहे.
एकबोटेने ३० डिसेंबरलाच मिटिंग घेतली होती म्हणजे याचा अर्थ जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंसा भडकली असाही होतच नाही.त्याबद्दल तक्रार करणारे हे जातकीडे अत्यंत जातीयवादी अन पाताळयंत्री आहेत.हे याद्वारे सिद्ध झाले.याशिवाय यांच्यामुळेच दुर्दैवी राहुल फटांगळेचा मृत्यू झाला त्याबद्दल या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
आंबेडकरी समाज कायम अशा अग्निपरीक्षेतून तावून सलाखून सहीसलामत बाहेर पडला आहे.आता परीक्षा आहे इथल्या माणूस म्हणून वावरणाऱ्या पशूंची बघूया यावेळी तरी पास होतात की नेहमीप्रमाणे फेलच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा