सोमवार, ८ जानेवारी, २०१८

मी लोकशाही न मानणारे परंतु इथे "अहिंसक" मार्गाने आंदोलन करणारे लोक असतील त्यांना सोबत घेईन-प्रकाश आंबेडकर

मान.ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी बीजेपीमाझाला
Jan 6, 2018 रोजी एक मुलाखत दिली होती.
त्यात बीजेपीमाझाचे तीन पत्रकार प्रश्न विचारत होते.पैकी Prasanna Joshi यांनी बाळासाहेबांचे एक वक्तव्य कोट करत त्यांना प्रश्न विचारला.
की या देशात लोकशाही न मानणारे चालतील काय?
त्यावर प्रकाश आंबेडकरांनी समर्पक उत्तर दिलेले आहे.
त्याबद्दल पुढे स्पष्टीकरण येईल.परंतु प्रसन्न जोशी यांनी फेसबुकवर
<लोकशाही न मानणारेही चालतील-प्रकाश आंबेडकर ,
आंबेडकरांना माओवादी पेशवाईपासून वाचवाsss>
अशी पोस्ट करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला
याचा मी इथे अगोदर निषेध करतो.एकतर त्यांना ते समजले उमजले नाही किंवा त्यांनी खोडसाळपणा केलेला आहे.तिसरी कोणतीही शक्यता नाही.
त्यामुळे त्यांनी किमान माफी मागण्याची अपेक्षा बाळगतो.
मराठी भाषा वळवावी तशी वळते असे म्हणले जाते.
तसेच आपण केलेलं वक्तव्य कुठल्या परिप्रेक्षात म्हणले गेले आहे.
त्यामागची पार्श्ववभूमी काय हे कोणतेही मत बनविण्याअगोदर आपण तपासून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
तर प्रकाश आंबेडकर जे म्हणाले ती या देशातील वस्तुस्थिती आहे.
सत्य आहे.हे कुणीही नाकारू शकत नाही.आणि मी स्वतः त्याचे इथे थेटपणे स्पष्टपणे समर्थन करतो.
काय म्हणाले ते - मी लोकशाही न मानणारे परंतु इथे "अहिंसक" मार्गाने आंदोलन करणारे लोक असतील त्यांना सोबत घेईन.
त्यांच्यासोबत उभा राहीन.
या वक्त्यव्याचे स्पष्टीकरण पाहूयाच.
त्याअगोदर देशात लोकशाही न मानणारे लोक शोधूया
सगळ्यात वरचा क्रमांक आरएसएस आणि तिच्या परिघावरील हिंदुत्ववादी पक्ष संघटना ज्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बाबरी पाडली.
लोकशाहीला डांबर फासले.
दुसरे हिंदू धर्मातील कांचीपिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती जे खुनाच्या आरोपात जेलयात्रा करून आले त्यांना अटक करू नये म्हणून रास्तारोको रेलरोको करत लोकशाहीचा खून करणारे भाजपआरएसएस आणि तिच्या परिघावरील हिंदुत्ववादी पक्ष संघटना.
राजसमंद येथील शंभूलाल रेगरला शिक्षा सुनावू नये म्हणून न्यायालयाच्या इमारतीवर चढून भारताचा लाडका तिरंगा काढून धर्माचा भगवा झेंडा फडकावून लोकशाहीचा तिसरा स्तंभ असणाऱ्या न्यायालयांना फाट्यावर मारणारे कट्टर हिंदुत्ववादी.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे ज्यांना लोकशाहीच अमान्य होती शिवसेनेत लोकशाही नाही हे ते अनेकदा भाषणात स्पष्टपणे म्हणाले आहेत.त्यांची शिवसेना स्टाईल आंदोलने नंतर उगवलेली मनसे त्यांची आंदोलने.
आणि शेवटचे नक्षलवादी माओवादी खलिस्तानवादी काश्मीरमधील फुटीरतावादी ज्यांची भाजपसोबत युती आहे सत्तेत आहेत.
हे झाले हिंसक कारवाया करणारे.किंवा लोकशाही न मानणारे.
यात अंर्तभूत करा आजचे वर्तमान भाजप सरकार.
जे भीमा-कोरेगांव येथील हिंसाचारातील आरोपीना अटक करत नाही मात्र आंबेडकरी समाजातील तरुणांना कोंबिंगऑपरेशन करून मारझोड करत आहे.काही ठिकाणी तर पोलिसांनी वस्त्यांमध्ये घुसून मारहाण केली आहे.
यात आणखी एक जोडता येईल.अंनतकुमार हेगडे जो म्हणाला होता की आम्ही इथे संविधान बदलायलाच बसलेलो आहोत.वरीलपैकी सर्व लोक लोकशाही मानत नाहीत.असे स्पष्टपणे मानता येते.
मात्र संविधानाचा खुट्टा मजबूत असल्यामुळे त्यांना लोकशाहीनुसार निवडणूक लढवून सत्तेवर यावे लागते.हे सर्व आपल्या देशातील दुर्दैवी परंतु ढळढळीत वास्तव.
आता प्रकाश आंबेडकर काय म्हणाले पहा.
की जे लोक लोकशाही मानणार नाहीत परंतु अहिंसक मार्गाने आंदोलने करतील त्यांना मी सोबत घेईन हिंसक मार्गापासून परावृत्त करेन
त्यांना हिंसक पेक्षा शांततेने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेन
हे बोलताना त्यांचा रोख होता डावे-कम्युनिस्ट.(Ref.सुधीर ढवळे)
हिंसेचा मार्ग सोडून अहिंसक आंदोलने करणार असतील तर त्यात गैर काय आहे?
याचा अर्थ सरळसोपा आहे.लोकशाहीत अहिंसक मार्गानेच आंदोलने करावी लागतात.त्या अर्थाने लोकशाही न मानणारेही पाय आपटत लोकशाहीच्या कक्षेतच उड्या मारणार मारत आहेत.इथे वैचारिक चर्चा डायलॉग महत्वाचे असेच ते सुचवू पाहत आहेत.
दुसरा अर्थ असा की कम्युनिस्ट किंवा नक्षलवादी माओवादी हिंसक मार्ग अवलंबत असतील तर त्यांना आपला विरोधच असणार आहे.
परंतु ते जर "अहिंसक" मार्गाने जात असतील तर त्याचा कुणाला कशाला त्रास झाला पाहिजे?
या देशात अनेक लोक लोकशाही मानतच नाहीत.हे स्पष्ट आहे.परंतु असे असताना जरा ते हिंसा करणार नसतील तर स्वागतच केले पाहिजे न?
मग काय चुकीचे म्हणाले बाळासाहेब आंबेडकर? ते चुकीचे ठरवले जात असतील तर वर उल्लेख केलेल्या लोकशाही न मानणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार उरतो काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate