15 ऑगस्टपेक्षा 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस आहे.
15 ऑगस्टला कमी लेखण्याचा प्रश्नच नाहीये.पण तोही आता "इतिहासच" झालेला आहे.आणि आपल्याकडे एक अशी फॅशन रुजवली जात आहे की गतइतिहासाबद्दल ब्र काढू नये.
15 ऑगस्टला कमी लेखण्याचा प्रश्नच नाहीये.पण तोही आता "इतिहासच" झालेला आहे.आणि आपल्याकडे एक अशी फॅशन रुजवली जात आहे की गतइतिहासाबद्दल ब्र काढू नये.
दुसरा मुद्दा आहे 15 ऑगस्टला आपण फारतर झेंडा फडकावतो स्वातंत्र्यसैनिकाना याद करतो त्यांचे कौतुक आहेच.परंतु दुसऱ्या महायुद्धात आपण भारतीय ब्रिटीशांच्या सैन्यात होतो आणि जपानच्या विरोधात लढत होतो.
होय तेच जपान ज्याच्याकडून आपण बुलेट ट्रेनची भीक घेणार आहोत.जपान ते देणारच आपल्या नाकावर टिच्चून.ब्रिटीशांच्या दफ्तरी कोणत्या समाजाचे कारकून अधिकारी होते कोण कोण ब्रिटीशांची पेन्शन खात होते.
ते तपासले तर काहीना तोंड लपवून फिरावे लागेल.तेच लोक अमुक तमुक इंग्रजांच्या बाजूने लढले असा अपूर्ण आणि खोडसाळ इतिहास मांडून इथे जातीत भांडणे लावून फोडा-झोडा ही नीती वापरून पुन्हा या देशावर आपली निरंकुश सत्ता असावी याची तोडजोड करत आहेत.
यासोबत करणी सेना सारख्या नवीनच अतिरेकी संघटना जन्माला घालून भविष्यात देशात अराजक माजवण्याची तजवीज करून ठेवत आहेत.याचा ट्रेलर आपण आज पाहिलेला आहेच.जेव्हा देश जळत होता.तेव्हा देशाचे नेतृत्व करणारे जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वित्झर्लंड मध्ये बर्फात फोटोग्राफी करण्यात मग्न होते.हे इतिहासात नोंदवले जाईलच.
याचसोबत म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा दिवस का आहे?
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करत आलो आहोत.प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.तेव्हा यास खरेतर लोकसत्ताक असा योग्य शब्द योजणे सुरु केले पाहिजे.सुरुवात इथून करूया.
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करत आलो आहोत.प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.तेव्हा यास खरेतर लोकसत्ताक असा योग्य शब्द योजणे सुरु केले पाहिजे.सुरुवात इथून करूया.
याचा व्यापक अर्थ जरा नीट समजून घेऊया.घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच त्यावेळचे सर्वच नेते ज्यांनी ज्यांनी घटनेला मान्यता दिली ती अंमलात आणण्यासाठी होकार दिला त्या सर्वांचे अगोदर आभार मानले पाहिजेत.तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काहीही किंतु परंतु मनात न ठेवता आभार मानूया.
त्यावेळी या सर्वानीच लोकांच्या बाजूने निर्णय घेतला.स्वार्थ ठेवला नाही.त्यावेळची ही माणसे वेगळी होती.यात काही अपवाद आहेत ते बाजूला ठेवा.परंतु ज्यांनी ही अमुल्य भेट देश बांधवाना दिली त्या सर्वांचेच मनाच्या अंतकरणातून आभार मानले पाहिजेत.मी या मताचा आहे.आणि आज आपली जबाबदारी जास्त वाढली आहे.
वर म्हणल्याप्रमाणे ही लोकांची सत्ता आहे.लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणाकरता चालवलेलं गणराज्य खरेतर किती सुंदर आणि उदात्त विचार आहे हा.आणि त्याबरहुकूम जर आपली घटना राबवली आपण तसे वागलो तर या जगाच्या पाठीवर आपल्या देशाशी बरोबरी करणारा देखील कोणताच देश उरणार नाही.एवढे मोठे तत्वज्ञान आपल्या राज्यघटनेत सामावलेले आहे.गरज आहे ते प्रामाणिकपणे राबविण्याची.
म्हणून 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी फार महत्वाचा दिवस आहे.
यासाठी संविधान वाचविणे ते योग्यप्रकारे राबविणे याची दक्षता प्रत्येक जात-धर्मातील लोकशाहीप्रेमी नागरिकाने घेतली पाहिजे.
यासाठी संविधान वाचविणे ते योग्यप्रकारे राबविणे याची दक्षता प्रत्येक जात-धर्मातील लोकशाहीप्रेमी नागरिकाने घेतली पाहिजे.
तुमचे हक्क,तुमचा नकार देण्याचा,आवाज उठवण्याचा,विरोध करण्याचा,लिहिण्याचा बोलण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य तुम्हाला केवळ आणि केवळ हे संविधानच देते बाकी कुणीही नाही.उद्या जर तेच नसेल तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा.कारण-
आज आपण सत्ताधारी भाजपने देशात जो काही धुमाकूळ घातला ते आपण सर्वांनी उघडपणे पाहिले त्यांच्या एका नेत्याचे कबुलीजबाब देखील पाहिले.यातून आपण बोध घेऊया अशा धर्माध शक्तींना आपल्या देशात थारा देता कामानये सत्ता देता कामा नये.
लक्षात ठेवा देशात यापुढे कधीही कुठेही दंगा सुरु होऊ शकतो.आपले प्रिय मुले-मुली नातेवाईक मित्र रस्त्यात कुठेही कधीही अशा हिंसक घटनांचे बळी जाऊं शकतात.याची खात्री बाळगा.अशा अप्रिय घटना घडू नये म्हणून वाईट गोष्टीना आपण थारा दिला नाही पाहिजे,
मंदिराने आपल्या आयुष्यातला प्रश्न सुटणार नाही.इतिहासातील पात्रे पुतळे स्मारके यांनी आपला प्रश्न सुटणार नाही.ना प्रगती होणार आहे.
ही खुणगाठ मनाशी पक्की करून ठेवा.लोकांची सत्ता अबाधित राखायची असेल तर जात-धर्मीय राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून न देता जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविणाऱ्या पक्षांना मतदान केले पाहिजे हेच खरे लोकसत्ताक व्यवस्थेचे भान आणि कर्तव्य आहे.
जात-धर्म-वेश-भाषा-संस्कृती विविधतेने नटलेल्या सर्वांगसुंदर देशातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार अभिव्यक्त होण्याचं निपक्ष स्वातंत्र्य बहाल करणारं संविधान !!
तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना मित्रांना सर्वांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचे मंगल हो !!
प्रजासत्ताक अन त्याचा दस्तावेज संविधान चिरायू होवो
जयभीम जय भारत जय संविधान !!
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचे मंगल हो !!
प्रजासत्ताक अन त्याचा दस्तावेज संविधान चिरायू होवो
जयभीम जय भारत जय संविधान !!